त्रिपिटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
त्रिपिटक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १४ एप्रिल, २०१४

चरिया पिटक मराठी.....







चरिया पिटक हे नाव तसे सामान्य वाचकांसाठी अपरीचीतच, परंतु पिटक हे नाव वाचताच धर्माच्या संबंधी आहे याची जाणीव होते. या पुस्तकाच्या नावाचा अर्थ होतो अर्थ होतो बोधीसत्वाच्या जीवनचर्या. भगवान गौतम बुद्धांनी त्यावेळी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती ते बोधीसत्वच होते. तो बराच मोठा कालावधी आहे, परंतु भगवान सारीपुत्राला आपल्या पुर्वजन्माच्या चर्यांबद्दल या पुस्तका मध्ये सांगतात कि त्यांनी कशा प्रकारे दहा पारमिता पूर्ण केल्या.

चरिया पिटकाचे तिपिटकातील स्थान शोधा...


हे पुस्तक वाचकांच्या स्वाधीन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या काळात धम्म साहित्य लिहिने, छापणे, विकणे याला लोकांनी आपला धंदाच बनविला आहे. मराठी इंटरनेट विश्वात धम्म साहित्याची कमतरता लक्षात घेता आमच्या संघाने मोफत धम्म सहित्य उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याच कार्यक्रमाचे एक पाउल म्हणजे चरिया पिटक मराठी नावाचे पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत. हे पुस्तक प्रकाशीत करताना बऱ्याच लोकांचे कळत - नकळत सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार....

साधू साधू साधू .....

सर्व जीव सुखी होवोत
सर्वांना हिताचा मार्ग सापडो..





सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

सोमवार, १० मार्च, २०१४

बौद्ध साहित्य परिचय (ग्रंथ नव्हे : संपूर्ण ग्रंथालय)



प्रत्येक धर्माला त्याच्या शिकवणी नुसार एक पवित्र समजले जाणारे पुस्तक असते. ख्रिश्चनांचे बायबल, मुस्लीमांचे कुराण, त्याचप्रमाणे बौद्धांचे त्रिपिटक..! परंतु त्रिपिटक म्हणजे कुराण - बायबल सारखे एखाद्या ग्रंथाचे नाव नसुन ग्रंथालयाचे नाव आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण बौद्धांच्या धर्मग्रंथाबद्दल नव्हे तर बौद्धांच्या धर्मग्रंथालया बद्दल माहिती घेऊया...


भाषेचे पावित्र्य नाही..!



प्रामुख्याने बौद्ध साहित्य आपल्याला पाली आणि बौद्ध मिश्र संस्कृत या भाषेमध्ये सापडते. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि धम्माची स्वतःची अशी एक कोणतीही पवित्र समजली जाणारी भाषा नाही. भगवान बुद्धांचा धर्म प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या भाषेमध्ये शिकण्याची परवानगी स्वतः भगवान गौतम बुद्धांनी दिली आहे, बौद्ध विश्वात हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.


एकदा (उपसंपदेपुर्वी ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले) दोन तरुण भिक्खु एकदा भगवानांजवळ आले, आणि त्यांना म्हणाले, कि आम्हाला भगवानांची शिकवण संस्कृतमध्ये भाषांतर करण्याची परवानगी द्यावी. परंतु भगवान गौतम बुद्धांनी याला सरळ नकार दिला. याच्यामागचे मुख्य कारण म्हणजे संस्कृत हि जनभाषा नव्हती तर देवांची भाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेला समजण्याचा आणि शिकण्याचा अधिकार तेवढा तो एखाद्या विशिष्ट वर्गालाच होता. भगवान म्हणाले माझ्या शिकवणीचे संस्कृत मध्ये भाषांतर झाले तर ती केवळ एखाद्या विशिष्ट वर्गा पुरताच मर्यादीत होईल. माझी शिकवण प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेत शिकवण्याचा अधिकार आहे. जेव्हा तुम्हाला संस्कृत येते तेव्हा तुम्ही संस्कृत मध्ये शिका. हि घटना शाक्य निरुत्तीय या नावाने ओळखली जाते.


आमच्याकडे एक ग्रंथ नाही, संपुर्ण ग्रंथालय आहे.



आज जगात धर्म या नावाने वाढणारे विविध सांप्रदाय आहेत. आणि धर्मग्रंथ म्हणुन ओळखले जाणारे त्यांचे स्वतःचे एक पुस्तकही आहे. यहुदींचे बायबल (जुना करार), इस्लामचे कुरआन, ख्रिस्त्यांचे बायबल (नवा करार), हिंदुंची गीता, वेदिकांचे वेद, शिखांचे गुरु ग्रंथ साहीब, इत्यादी, इत्यादी. या सर्वांचा विचार करता बुद्धाचा धर्म कोणत्या धर्मग्रंथाद्वारे सांगण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न पडतो.. तेव्हा याचे सरळ आणि सोपे उत्तर म्हणजे बुद्धाच्या धर्माचे धर्मग्रंथ म्हणण्यासारखे एकही पुस्तक नाही तर संपुर्ण ग्रंथालय आहे.


जे त्रिपिटक या नावाने ओळखले जाते ते काही एकच पुस्तक नाही आहे, तर विविध ग्रंथांचा संग्रह आहे. या लेखामध्ये आपण बौद्ध साहित्याची व्याप्ती आणि थोडक्यात परिचय याबद्दल जाणुन घेऊया...


धम्माचे मुळ ग्रंथ त्रिपिटक ती भागात विभागले आहे.


१. विनयपिटक,
२. सुत्तपिटक,
३. अभिधम्मपिटक




१. विनयपिटक : सामान्यतः विनयपिटकामध्ये

(अ) महावग्ग
(ब) चुलवग्ग
(क) पाराजिक
(ड) पाचित्तिय
(इ) परिवार. या पाच ग्रंथांचा समावेश आहे.



२. सुत्तपिटक : सुत्तपिटकामध्ये पाच ग्रंथांचा समावेश होतो.

(अ) दिघ निकाय - ३४ सुत्त,
(ब) मज्झिम निकाय - १५२ सुत्त
(क) संयुत्त निकाय - ७७६२ सुत्त
(ड) अंगुत्तर निकाय - ९५५७ सुत्त
(इ) खुद्दक निकाय - खुद्दक निकायामध्ये इतर निकायांप्रमाणे सुत्तांऐवजी १५ ग्रंथांचा समावेश होतो. ते पुढील प्रमाणे :

१. खुद्दकपाठ
२. धम्मपद
३. उदान
४. इत्थिवत्थु
५. सुत्तनिपात
६. विमानवत्थु
७. पेतवत्थु
८. थेरगाथा
९. थेरीगाथा
१०. जातक
११. अपदान
१२. निद्देस
१३. पटिसंभिदामग्ग
१४. बुद्धवंश
१५. चरियापिटक



३. अभिधम्मपिटक : अभिधम्मपिटकात प्रामुख्याने सात ग्रंथांचा समावेश आहे.

१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान



पाली त्रिपिटकाशिवाय पाली वाङ्मयामध्ये पाली अनुपिटकांचाही समावेश होतो. अनुपिटक म्हणजे त्रिपिटकाच्या रचनेनंतर रचण्यात आलेले साहित्य.

पाली अनुपिटक :
१. नेत्तिपकरण
२. पेटकोपदेश
३. मिलिंद प्रश्न
४. विसुद्धीमग्ग
५. अट्ठकथा
६. टिका

दीपवंस, महावंस, चुळवंस, बुद्धघोसुप्पति, सद्धम्मसंगह, महाबोधिवंस, थूपवंस, गंधवंस, सासनवंस, अनागतवंस, बुद्धालंकार, जिनालंकार, तेलकटाहगाथा, जिनचरित, सद्धम्मोपाय, पञगतिदीपन, सहस्सवत्थुपकरण, इत्यादी ग्रंथांचा समावेश पाली अनुपिटका मध्ये होतो.


पाली त्रिपिटकाची व्याप्ती खुप मोठी आहे, जर आपण त्यांचा संग्रह केला तर ५०० पेक्षा जास्त पानांचे एक खंड अशाप्रकारे ४५ पेक्षा जास्त खंड बनतील. शिवाय त्रिपिटकाच्या अट्ठकथा, टिका यांची व्याप्ती मुळ त्रिपिटकापेक्षाही जास्त आहे.


शिवाय तिबेटियन साहित्याचे ३३७ खंड, चिनी साहित्याचे प्रत्येकी १००० पानांचे १०० खंड. याखेरीज मंगोलीय आणि जपानी साहित्यांचा विचार केल्यावर आपल्याला बौद्ध साहित्याची व्याप्ती किती मोठी आहे याचे अनुमान लावणे कठीणच आहे...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


मराठी धम्मपद

आम्हाला फेसबुकवर Follow करा

भगवान बुद्धांचा भिक्खु संघ

बुधवार, ८ जानेवारी, २०१४

खरा ब्राह्मण कोण……?




आजकाल एखाद्या विशिष्ट जातीत, समाजात कोणी जन्म घेतला कि तो स्वतःला ब्राह्मण समजु लागतो, परंतु भगवान बुद्धांना त्यांचा हा अर्थ अभिप्रेत नव्हता... भगवान बुद्ध एखाद्याचे श्रेष्ठत्व त्याच्या कर्मावरुन मानायचे जन्मावरुन नव्हे. यासाठी भगवान बुद्धांनी अश्वलायन ब्राह्मण कुमाराला अश्वलायन सुत्तामध्ये केलेला उपदेश, भारद्वाज ब्राह्मणाला वसल सुत्तामध्ये दिलेला उपदेश व आणखीही बरीच उदाहरणे देता येतील. परंतु या लेखामध्ये आपण धम्मपदातील सर्वात शेवटच्या ब्राह्मण वग्गाचा उपयोग संदर्भ म्हणुन घेऊया...


भगवान बुद्ध धम्मपदाच्या ब्राह्मण वग्गामध्ये ब्राह्मण कसा असावा..? कोणाला ब्राह्मण म्हणावे याबद्दल सांगतात परंतु काही अज्ञानी मात्र याकडे बोट दाखवुन म्हणतात कि बुद्ध ब्राह्मणांना किती धन्य मानायचा, ब्राह्मणांची किती स्तुती करायचा. असे बोलुन ते अज्ञानी आपण किती अज्ञानात आहोत याचा जणु पुरावाच देत असतात. परंतु त्यांच्या मुर्ख बडबडीकडे दुर्लक्ष करा, बौद्धांना धम्ममार्गावरुन हटविणे हेच त्यांचे ध्येय असते. अशा अज्ञानी लोकांना मी म्हणेन कि प्रत्येक गाथेतुन खरा अर्थ घ्यायला शिका.. ते आकलन करण्याची लायकी नसेल तर धम्मपदाच्या अट्ठकथा वाचा.... मी सुरुवातीलाच सांगीतल्याप्रमाणे भगवान बुद्ध हे मानवाला त्याच्या कर्मानुसार लेखत असत जन्मानुसार नव्हे... बुद्ध ब्राह्मणावर कोपणाऱ्याचा धिक्कार करायचा...


अरे हो पण कोणते ब्राह्मण..? ब्राह्मण जात का...? नाही पुढील वर्गामध्ये सांगीतलेले गुण ज्याच्यामध्ये आहेत तोच खरा ब्राह्मण....

अशोक तपासे सरांनी अनुवादीत केलेला धम्मपदाचा ब्राह्मण वग्ग पुढील प्रमाणे :


ब्राह्मणवग्ग



• हे ब्राह्मणा.! स्त्रोत तोडुन टाक, प्रयत्नाने कामना दुर कर, भौतीकतेचा क्षय करुन अकृताचा जाणकार हो, ब्राह्मणा!

• जेव्हा ब्राह्मण दोन स्वभाव (चित्त संयम व विपश्यना) गुणात पारंगत होतो, त्या ज्ञानीची सर्व बंधने विनाशाकडे जातात.

• ज्याचा पार, अपार, पारापार असत नाही. जो निर्भय आहे, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो ध्यानी, निर्मळ, कृतकृत्य, स्त्रोतहीन आहे ज्याने उत्तम अर्थ प्राप्त केला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• दिवसा सुर्य तळपतो, रात्री चंद्र प्रकाशतो, सशस्त्र क्षत्रीय तळपतो, ध्यानमग्न ब्राह्मण तळपतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवसरात्र तळपत असतात.

• ज्याचे दुष्कर्म वाहुन गेले आहेत तो ब्राह्मण, ज्याचे आचरण सम्यक आहे तो श्रमण, ज्याचे चित्त-दोष दुर सारले आहेत तो प्रवज्जीत म्हणवीला जातो.

• ब्राह्मणावर प्रहार करु नये, ब्राह्मणांनी त्याच्यावर कोपु नये. ब्राह्मणांची हत्या करणाऱ्याचा धिक्कार, त्यापेक्षा त्याच्यावर कोपणाऱ्याचा धिक्कार.

• मनाला प्रिय असलेल्याचा निषेध, हि गोष्ट ब्राह्मणाला कमी श्रेष्ठ नाही, जसे मन हिंसा निवृत्त होते, तस तसे दुक्खाचे शमन होते.

• ज्याच्या कायेने, वाचेने, मनाने दुष्कृत्य केलेले नाही, या तिन्ही ठिकाणी जो संयमीत आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• सम्यक संबुद्धाने उपदेशीलेला सिद्धांत ज्याच्याकडुन जाणुन घेतला त्याला तसाच दक्षतेने नमस्कार करावा.

• ना जटेने, ना गोत्राने, जन्माने ब्राह्मण होत. ज्याच्यात सत्यता, सदाचार, शुचिता असतो तो ब्राह्मण.

• हे दुर्बुद्ध मानवा! या जटा कशाला? हे व्यघ्र वस्त्र कशाला? तु आतुन मळलेला आहेस. आणी बाहेरुन धुतो(गंगास्नान) आहेस.

• जो चिंध्या धारण केलेला जीव, ज्याच्या धमन्या दिसत आहेत, एकटा वनात ध्यानस्थ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ब्राह्मण मातेच्या योनीतुन उत्त्पन्न झालेला आहे त्याला मी ब्राह्मण म्हणत नाही. त्याला भो(सन्माननीय संबोध) सबोधतात. जो काहीही बाळगुण नाही काहीही घेत नाही त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• सर्व बंधने तोडुन ज्याला चिंता वाटत नाही, ज्याने सर्व संगती विभक्त केले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• दोऱ्या, पट्टे, साखळ्या तोडुन (गाडी जुंपतात ते) जु झिडकारुन जो बाधारहीत होऊन बुद्ध होतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• शिव्या, दण्ड, बंधन यांना जो अदृष्टपणे (चांगुलपणाने) सहन करतो, क्षमा शक्ती हीच ज्याची प्रबळ सेना आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो अक्रोधी, शिलवान, स्वल्प, जो संयमीत, अंतीम-शरीरी आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• कमळ पानावर जलबिंदु, वा सुईच्या टोकावर मोहोरी, तसा कामनांशी जो चिकटुन राहात नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो आपल्या दुःखाचा क्षय इथेच स्पष्ट जाणतो, जो भारमुक्त, बंधमुक्त आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो गंभीर प्रज्ञ, सुजाण, मार्ग- अमार्गाचा सुज्ञ आहे ज्याला उत्तम अर्थ प्राप्त झालेला आहे, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो गृहस्थ, गृहहीन दोघांपासुन अलिप्त आहे, जो घरापासुन दुर निरिच्छ आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो चर अचर प्राण्यांना दंडापासुन अलिप्त असतो, जो ना मारतो ना घात करतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• विरोधकात अविरोधी, दण्डधारींमध्ये शांत, ग्रहणकर्त्यात अग्रहणकारी, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याच्या चित्तातुन, मोह, द्वेष, मान, अहंकार, मत्सर निखळला आहे, जसे सुईच्या टोकावरुन मोहोरी निखळावी, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो.

• जो अप्रिय न बोलता, सत्य वचन बोलतो, ज्याच्या बोलण्याने कोणीही क्रोधीत होत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• लांब वा आखुड, लहान वा मोठी, चांगली वा वाईट, जी जोवर कुणी दिलेली नाही, तोवर घेत नाही. (चोरी करत नाही) त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याला कुठेही कसलीच आशा असत नाही, जो निरिच्छ, निर्बंध आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याच्या मनात इतरांचा संशयाने काहीही निमीत्य असत नाही, ज्याला अगाध अमृताची प्राप्ती झाली आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याचे सत्कर्म व दुष्कर्म दोहोंच्या इच्छा पार केल्या आहेत. जो शुद्ध व शोकरहीत आहे त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो चंद्रासारखा निर्मळ, स्वच्छ मनाचा आहे. ज्याचा मोह-भाव अतिक्षीण झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याने हा धोकादायक दुर्गम संसार-मोह ओलांडला आहे. ध्यानधारणेत उत्तीर्ण. तृष्णेचा पार गेलेला नि:संशयी ज्याच्या निवृत्तीला कारण नाही. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो वासनांचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा वासना भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.


• जो तृष्णाचा नि:पात करून, बेघर होऊन प्रवज्जीत झाला आहे. ज्याचा तृष्णा भाव अतिक्षीण झाला आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याने मानवी संबंध सोडले आहेत, जो दिव्य संबंधांच्या पार गेलेला आहे, जो सर्व संबंधांपासुन परावृत्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो प्रीती आणी अप्रीती सोडुन शांत भावप्राप्त क्लेशहीन आहे. ज्या विराने सर्व लोकांना जिंकले त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती आणी अंत जाणतो, जो अनासक्त सन्मार्गावर आहे, सुज्ञानी आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याची गती देव, गंधर्व, मानव कुणीही जाणत नाही, ज्याचे स्त्रोत क्षीण झाले आहेत, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• ज्याचे पुर्वी, आता, पुढेही काहीच नाही, जो काहीही बाळगुन नाही, काहीही घेत नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो,

• जो प्रज्ञावंत आहे, ज्याला निर्वान पद प्राप्त झाले आहे. जो वृषभ, श्रेष्ठ, वीर, महर्षी, विजेता, तृष्णाहीन आहे. त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

• जो पुर्व स्थान जाणतो, स्वर्ग व नरक पहातो, ज्याचे जीवन क्षीण झाले आहे, जो प्रज्ञावान मननी आहे, जो निर्वाण प्राप्त आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो.

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :

ब्राह्मण वर्णाची थोरवी.. (अश्वलायन सुत्त...)

वसल सुत्त


रविवार, ५ जानेवारी, २०१४

यज्ञाचा खरा अर्थ (बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ होय....)

भगवान बुद्धांचा यज्ञसंस्थेला असलेला विरोध जगजाहीर आहे. प्राचीन काळी वैदिक लोक ईश्वराला व देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामध्ये अनेक प्राण्यांची आहुती द्यावी लागत असे, अशा प्रकारच्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता, परंतु ज्या यज्ञामध्ये हिंसा होत नाही अशा प्रकारच्या अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध नव्हता व अशा प्रकारचे यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांचा हा समज अगदी चुकीचा आहे.




१. हिंसक यज्ञ : हिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य नव्हते, प्राण्यांची आहुती देऊन केल्या जाणाऱ्या यज्ञांना भगवान बुद्धांचा विरोध होता. 


२. अहिंसक यज्ञ : अहिंसक यज्ञांना भगवान बुद्धांनी विरोध केला नव्हता कारण या यज्ञांपासुन कोणाचीही हानी होणार नव्हती.





भगवान बुद्धांनी अहिंसक यज्ञांना विरोध केला नव्हता., मगअहिंसक यज्ञ भगवान बुद्धांना मान्य होते काय...?


नाही...! भगवान बुद्धांनी जरी अहिंसक यज्ञांना विरोध केला नसला तरी ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग त्यांना मान्य नव्हता, याबद्दल आपल्याला धम्मपदातील पुढील गाथांमधुन समजते....




• मासे मासे सहस्सेन, यो यजेथ सतं समं। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥





→ महिनो महिने हजार यज्ञ, शंभर वर्षापर्यंत पुन्हा पुन्हा, आणी एकच विषेश प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे पुजन श्रेष्ठ होते, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा..





• यो च वस्ससतं जन्तु, अग्गिं परिचरे वने। एकञ्च भावितत्तानं, मुहुत्तमपि पूजये। सायेव पूजना सेय्यो, यञ्चे वस्ससतं हुतं॥ 




→ शतवर्ष, वनात विहारणाऱ्या जीवांना यज्ञात आहुती, आणी एकच विशेष प्रज्ञावंताचा क्षणभराचा सत्कार, हे सत्कार श्रेष्ठ आहे, शतवर्ष केलेल्या यज्ञापेक्षा.





• यं किञ्चि यिट्ठं व हुतं व लोके, संवच्छरं यजेथ पुञ्ञपेक्खो। सब्बम्पि तं न चतुभागमेति,अभिवादना उज्जुगतेसु सेय्यो॥





→ या लोकात पुण्याच्या अपेक्षेने वर्षभर यज्ञ करणे, काही आहुती देणे, हे सर्व उज्वल-श्रेष्ठाला अभिवादन करण्याच्या चौथ्या भागा इतकेही नाही.


(खुद्यकनिकाय १० : १०६-१०८)


वरील गाथांवरुन आपल्याला समजते कि यज्ञ हिंसक असोत कि अहिंसक भगवान बुद्धांना कोणत्याही प्रकारचे यज्ञ मान्य नव्हते...


मग भगवान बुद्धांची यज्ञाची संकल्पना कशी होती..? याचे उत्तर आपल्याला दिग्घ निकायाच्या कुटदंत सुत्तामध्ये सापडते...




बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ आहे....



एकदा कुटदंत नावाच्या ब्राह्मणाने यज्ञ करायचे ठरवले, त्या यज्ञासाठी विविध गावांमधुन निरनिराळे विद्वान ब्राह्मण आले होते, भगवान बुद्ध त्याच्या गावामध्ये विहार करत आहेत हे त्याला समजल्यावर तो ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धांच्या भेटीला गेला. भगवंतांना भेटुन कुटदंतांनी त्याला नमस्कार केला. आणि म्हणाला, आपल्याला यज्ञाचा उत्तम विधी माहीत आहे, कृपया तो समजावुन सांगावा..

तेव्हा भगवंतांनी कुटदंताला पुढील कथा सांगीतली.


प्राचीन काळी एक राजा होता, एके दिवशी तो एकांतामध्ये बसला असताना त्याचा मनात असा विचार आला कि, माझ्याजवळ खुप संपत्ती आहे तिचा वापर मी महायज्ञात केला तर यामुळे मला पुण्य प्राप्त होईल आणि या पुण्याद्वारे मी चिरकाळापर्यंत सुखी बनेन. हि इच्छा त्याने त्याच्या राजपुरोहिताला सांगीतली.

पुरोहित म्हणाला, ठिक आहे महाराज, परंतु आपल्या राज्यामध्ये सध्या अशांतता आहे, गावे आणि शहरे लुटली जात आहेत, वाटसरुंना लुटले जात आहे, अशा स्थितीत यज्ञामुळे खुप आर्थिक हानी होईल आणि लोकांवर कर बसवावा लागेल अशा स्थितीत लोकांवर कर बसवला तर राज्यात अराजकता निर्माण होईल.

सर्वप्रथम आपल्याला चोरांचा बंदोबस्त करावा लागेल, जे आपल्या राज्यात शेती करु इच्छितात त्यांना बी बियाणे पुरवा, जे व्यापार करु इच्छितात त्यांना भांडवर कमी पडु देऊ नका, जे सरकारी नौकरी करु इच्छितात त्यांना योग्य वेतन द्या, याच्यामुळे सर्व कामामध्ये जातीने लक्ष दिल्याने, वेळोवेळी भरगच्च कर वसुल होऊन राज्याच्या तिजोरीमध्ये धनाची वृद्धी होईल.


राजाने पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे केले, यामुळे खुप कमी काळातच त्याचे राष्ट्र एक समृद्ध राष्ट्र बनले, दरोडे आणि चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे जास्तीत जास्त मिळणाऱ्या करामुळे तिजोरीतील धनाची वृद्धी झाली. राज्यात सगळीकडे सुखासमाधानाचे वातावरण निर्माण झाले.


काही दिवसांनंतर राजा पुरोहिताला म्हणाला,

तुम्ही सांगीतल्याप्रमाणे मी सर्व काही केले माझ्या तिजोरीतील संपत्ती खुप वाढली असुन राष्ट्रातील लोक निर्भयपणे व आनंदाने जीवन जगत आहेत. तेव्हा आत्ता मला महायज्ञ करायचा आहे.

पुरोहित म्हणाला, महाराज यद्न करण्यापुर्वी सर्वप्रथम आपण आपल्या प्रजेची परवानगी घ्यावी..

पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे राजाने प्रजेची परवानगी मिळवली.

आणि पुरोहिताने यज्ञाची तयारी केली. तो राजाला म्हणाला, या यज्ञामध्ये माझी अमाप संपत्ती नष्ट होणार आहे, असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये, यज्ञ सुरु असतानाही आपली संपत्ती नष्ट होत आहे असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये., यज्ञ संपल्यावर आपली संपत्ती यामध्ये नष्ट झाली असा विचार तुझ्या मनामध्ये येता कामा नये.


आपल्या यज्ञामध्ये अनेक चांगले वाईट लोक येतील पण तु चांगल्या लोकांकडे लक्ष ठेवुन आपले मन आनंदित ठेवावे.



त्याच्या यज्ञामध्ये गाय, बैल, बकरी, मेंढी, इत्यादिंची आहुती देण्यात आली नाही, झाडे तोडण्यात आली नाही, मजुरांना जबरदस्तीने काम करायला लावले गेले नाही. ज्यांना इच्छा होती त्यांनी स्वेच्छेने कामे केली, तेल, मध, लोणी, तुप आदी पदार्थांनी यज्ञ पुर्ण करण्यात आला.



यज्ञ संपल्यावर राज्यातील धनाढ्य लोक भेटवस्तु घेऊन आले. तेव्हा राजा त्यांना म्हणाला, मला तुमच्या भेटवस्तुंची मुळीच गरज नाही धार्मिक कराच्या रुपाने माझ्याजवळ भरपुर संपत्ती जमा झाली आहे. त्यापैकी तुम्हाला काही हवे असेल तर खुशाल घेऊन जा. आणि राजाने गोरगरीबांना आपली भरपुर संपत्ती दान देण्यात वाटली.



भगवान बुद्धांकडुन हि कथा ऐकल्यावर कुटदंत आणि त्याचे ब्राह्मण मित्र म्हणाले, फारच चांगला यज्ञ... असे म्हणत ते ब्राह्मण आणि कुटदंत भगवाम बुद्धांचे उपासक बनले, व यज्ञासाठी आणलेले सातशे बैल, सातशे गोरे, सातशे मेंढ्या, व सर्व प्राण्यांना त्याने मोकळे केले...



या कथेद्वारे भगवान बुद्धांचे दोन्ही हिंसक आणि अहिंसक यज्ञाबद्दलचे मत कळते. यज्ञात प्राण्यांची आहुती देणे हे भगवान बुद्धांना मान्य नव्हते, तर केवळ यज्ञ केल्याने राज्य सुख समृद्ध बनते हा सिद्धांतही त्यांना मान्य नव्हता. तर ते यज्ञ करण्याऐवजी लोकांची बेकारी दुर करणे हाच खरा यज्ञ होय हे या कथेवरुन समजते...



निष्कर्ष : जो धर्म सुखसमृद्धीच्या इच्छेने ईश्वराला व देवतांना संतुष्ट करण्यासाठी प्राण्यांची हत्या करुन त्यांची आहुती देण्याला यज्ञ मानतो त्याच्यापेक्षा राज्यातील बेकारी दुर करायला सांगणारा मानवधर्म केव्हाही श्रेष्ठच ठरणार..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

पूजेचा खरा अर्थ

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा...
भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण)

रविवार, १ डिसेंबर, २०१३

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)


पूर्वीच्या वैदिक धार्माप्रमाणे धर्माप्रमाणे वैदिक लोक सर्व दिशा, सुर्य, चंद्र, नद्या, मोठे ह्यांची सर्व आशीर्वाद किंवा प्राप्तीसाठी पुजा करतात. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टीची निर्मीती केली आहे, त्यामुळे सृष्टीतील अनेक गोष्टींना देवता मानुन त्याची ते पुजा करतात...


भगवान बुद्ध अशा प्रकारच्या ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांना मानत नव्हते. एकदा एक कुलपुत्र भगवंतांना सहा दिशांची प्रार्थना करताना दिसला, तेव्हा त्यांनी यापुढी अशाप्रकारची प्रार्थना न करण्याचा उपदेश केला. व पुजेचा खरा अर्थ समजावुन सांगीतला. अशा प्रकारची कथा दिग्घनिकायाच्या सिगलसुत्तात आलेली आहे.



भगवान बुद्ध एकदा वेळु वनात राजगीरजवळ वास करीत असताना, सिगल नावाचा तरुण कुलपुत्र अशाप्रकारे सहाही दिशांची पुजा करताना दिसला. भगवंतांनी त्याला विचारले कि अशाप्रकारे तु कशाची पुजा करीत आहेस. तेव्हा सिगल म्हणाला, माझ्या वडीलाने मृत्युपुर्व सांगितलेल्या पवित्र शब्दांचा आदर करण्यासाठी मी अशाप्रकारे पुजा करीत आहे, त्यांनी मला सहा दिशांची पुजा करायला सांगितले..


त्यामुळे अशा प्रकारची पुजा केल्याने मला देवाचा आशिर्वाद प्राप्त होईल.


तेव्हा भगवान म्हणाले, ठीक आहे तु पुजा कर..! परंतु तुला तो विधी समजला नाही. तुथे पहिले कर्तव्य आहे कि तुझे घर सांभाळावे, तुझी पत्नी, तुझी मुले सांभाळावीत व त्यांना कोणतेही वाईट कृत्ये करण्यापासुन परावृत्त करावे. मी तुला ह्या सहा दिशांचा अर्थ सांगतो तो असा आहे.





•आई वडील हे पुर्व दिशा आहेत.
•शिक्षक हे दक्षिण दिशा आहेत.
•मुले, पत्नी हे पश्चिम दिशा आहेत..
•मित्र व नातेवाईक हे उत्तर दिशा आहेत.
•सहकारी व नौकर हे खालची दिशा आहेत.
•तर श्रमण व ब्राह्मण आणि इतर धार्मिक व्यक्ती हे वरची दिशा आहेत.




तेव्हा सिगल म्हणाला, भगवान मला याविषयावर सविस्तर माहिती सांगा...





पुजेचा खरा विधी





सिगल, मी तुला पुजेचा विधी समजावुन सांगतो,, पुजा करण्यापुर्वी तु आणि कोणताही गृहस्थ चार प्रकारच्या कर्मक्लेशांपासुन, पापांच्या चार कारणांपासुन तसेच विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग करायला हवा.



•चार दुर्गुण•


माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त राहायला शिकविले पाहिजे.


•जीवहत्या करणे, 
•न दिलेले जबरदस्तीने घेणे, 
•व्यभिचार करणे आणि 
•असत्य बोलने, हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत.


सिगल, हे लक्षात ठेव की,



•पक्षपातीपणा, 
•शत्रूत्व, 
•मुर्खपणा आणि 
•भय हि पापांची कारणे आहेत, यामुळे पापकर्म घडत असतात. यांपैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही...



माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करु नये असे शिकविले पाहिजे .



• सहा प्रकारची संकटे •




•मद्यपानाचे व्यसन, 
•अवेळी रस्त्यावरुन भटकत राहने, 
•जत्रांतून परिभ्रमण करणे, 
•जुगाराची सवय जडणे, 
•कुमित्रांची संगत धरने आणि 
•आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते.





१. मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उदभवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शील भ्रष्टता, अश्लील वर्तणुक आणि बुध्दीनाश ही ती सहा संकटे होत.


२. अवेळी रस्त्यावरुन भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो. तो म्हणजे, तो स्वत: , त्याची बायकामुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात. आणि त्यांना त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो.


३. जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करत राहतो की, नाचणे, गाणे , बजावने, काव्य, गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का?


४. जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी सहा संकटे म्हणजे,



•खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेश करतात, 
•हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वत: शोक करतो. 
•त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते, 
•न्यायालयासमोर त्यांच्या शब्दाला किंमत उरत नाही, 
•त्याचे मित्र आणि त्याचेसहकारी त्याचा तिरस्कार करतात. 
•लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. 
(कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालन पोषण कसे करता येणार?)




५. कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणीही जुगारी, व्यभिचारी, दारुबाज, लबाड, पैसेखाउ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते.



६. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे, तो म्हणतो, फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गर्मी आहे म्हणून मी काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो हातात फार काम आहे म्हणून मी काम करीत नाही आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी हौ लागते.




• व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे.•


मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुत शत्रु असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत.


•लोभी पुरुष, 
•बोलघेवडा परंतु कृतीने शून्य, 
•खुशामत्या पुरुष आणि 
•उधळ्या वृत्तीचा पुरुष...



१. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरुन मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रूसारखा वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भितीने आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मुळ हेतू स्वार्थ साधने हा असतो.


२. जो बोलघेवडा आहे तो कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो.


३. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करायला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो.


४. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाचतमाशा पाहतांना तो तुम्हाला सोबत करतो . तुम्ही द्युतक्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो.



५. मन:पूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात,


•सहाय्यक, 
•सुखादु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा,
•सदवर्तनाचा सल्ला देणारा आणि 
•सहानुभूती दाखविणारा सहाय्यक..



हे खरे मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो.



६. सुख - दु:खामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हांला सांगतो. तुमची गुपितो तो गुप्त ठ्वतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग कतीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार होतो.



७. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो. सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऎकले नाही अशा चार गॊष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो.



८. तुमच्या बद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दु:खाने दु:खी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो, असे भगवंत म्हणाले.




चार कर्मक्लेशांचा, चार पापांच्या कारणांचा आणि विपत्तीच्या सहा द्वारांचा त्याग केल्यावर गृहस्थाने सहा दिशांचा आरंभ करावा...






१. पुर्व दिशा : आई वडील...



पुजेची प्रथम दिशा आहे पुर्व दिशा म्हणजे आई वडील, त्यांच्या पुजेची पाच अंगे आहेत.

मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की, माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्य करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे. आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलावर प्रेम करीत असतात. दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सदगुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करुन देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपतात.






२. दक्षिण दिशा : शिक्षक



शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरुन उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतात ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्यांच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व त-हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात.






३. पश्चिम दिशा : पति-पत्नीसाठी विनय



१. पतीने आपल्या पत्नीची सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करुन, तिच्याशी एकनिष्ठेने वागून, तिला सत्ता देउन, तिला लागणारे दागदागिने पुर्वून तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते. ती सासर-माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करुन आपले कर्तव्य बजविते. ती पातिव्रत्याने वागते. आपल्या नवऱ्याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.







४. उत्तर दिशा : मित्र व नातेवाईक




कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्यानेने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहकाऱ्यांची सेवा करावी. आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वत:त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्याच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपदअवस्थेत त्याग करीत नाहीत आणि त्यांच्या परिवाराच्या हिताला जपतात.







५. खालची दिशा : धनी व सेवक यांसाठी विनय



धन्याने नोकर-चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे :



•त्याने त्यांच्या सामर्थ्याप्रमाणे त्यांना काम द्यावे. 
•अन्न व मजुरी द्यावी. 
•ते आजारी पडले असताना त्यांची शुश्रुषा करावी.
•असाधारण स्वादिष्ट पक्वान्ने त्यांनी वाटून खावी. 
•वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी.



कारण नोकरचाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात आणि त्याच्या नंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यांत ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि त्याची किर्ती सर्वत्र वाढवितात.






६. वरची दिशा : धर्मगुरु



कुलपुत्राने आपल्या धर्मगुरुची सेवा काया वाचा आणि मनाने, त्याच्यावर प्रिती करुन, आपल्या घराचे दार सदैव मोकळे ठेवून व त्याच्या ऎहिक गरजा भागवून करावी कारण धर्मगुरु आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड:मुख करतात. त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात.




निष्कर्ष...


१. जो धर्म मानवधर्म आहे तो मानवाला सहा दिशांची पूजा करण्याऎवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धर्मगुरु यांचा मान राखायला शिकवितो......


भगवंतांनी सिगलला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, सुंदर! फार सुंदर! एकदा स्थान भ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी किंवा जे गुप्त होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाने भगवंतांनी मला सत्य विषद करुन सांगितले आहे.

मी भगवंतांना, त्यांनी सांगितलेल्य धम्माला आणि संघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा.


आज अडीच हजार वर्षांनंतरही त्या महामानवाची शिकवण काळाशी किती सुसंगत वाटते.. कारण भगवान बुद्धांचा धम्म अकालिको आहे, त्याला काळाची काही सीमा नाही.


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :


१. भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

२. मराठी धम्मपद

३. रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ नाथपुत्रावर विजय)

सच्चक हा तरूण निर्गंथ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. तो वादविवादात अतिशय पारंगत बनला होता, त्याला विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. त्याला ४ मोठ्या बहिणी होत्या त्या सुद्धा त्यांच्या पालकांनी शिकविलेल्या एक हजार विद्यांमध्ये पारंगत बनल्या होत्या. परंतु महास्थाविर सारीपुत्र यांच्यासोबत वादविवादात झालेल्या पराभवामुळे त्यांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. आणि खुप कमी वेळात अरहंतपद प्राप्त करुन घेतले. सच्चक हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात हुशार होता. त्याने आपल्या पालकांकडुन हजार प्रकारच्या विद्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या विद्या त्याला येत होत्या. तो आपल्या हुशारीने आंधळा बनला होता. तो लिच्छवीच्या राजकन्येचा शिक्षक म्हणुन वैशालीला रहायचा....



तो स्वतःबद्दल जाहीरपणे सांगायचा कि, मी वादविवादात माझ्यापेक्षा पारंगत या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. तो स्वतःला अतिशय विद्वान आणि पवित्र समजायचा. वैशाली शहरात तो जाऊन अशा प्रकारच्या बढाया मारताना तो नागरिकांना म्हणायचा 


मी अशा एकाही पंथाच्या नायकाला बघु शकत नाही कि जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तो कोणत्या संघाचा नायक असो, कोणता तपस्वी असो, एवढेच नव्हे तर स्वतः सम्यक संबुद्ध सुद्धा असो,, माझ्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही..



एके दिवशी शहरातुन भटकत असताना त्याने स्थाविर अश्वजीत यांना बघितले. ते भिक्षाटन करत होते. तेव्हा सच्चक अश्वजीत यांना भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल विचारले आणि भगवान बुद्धांसोबत वादविवाद करुन त्या वादविवादात त्यांना हरविण्याची इच्छा प्रगट केली.


भगवान बुद्धांच्या अनित्यवाद, अनात्मवाद, दुःख, इत्यादी शिकवणींच्या बद्दल ऐकल्यावर त्याचा असा समज झाला कि,, भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यानंतर त्याने लिच्छवींच्या सभेमध्ये बुद्धांसोबत वादविवाद करण्याचे जाहीर केले यासाठी लिच्छवींच्या राजकन्येला आपला वादविवादात असलेला दबदबा आपली विद्वानता बघण्यासाठी आमंत्रीत केले.


त्यावेळी भगवान बुद्ध महावन नावाच्या जंगलात असताना सच्चक आपल्या पाचशे अनुयायी व लिच्छवींसह भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांना भेटल्यानंतर काहीशी विचारपुस केली. आणि विशिष्ट विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. भगवान बुद्धांनी संमती दिल्यानंतर, त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला जाणुन घ्यायचे होते कि भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले. (जेव्हा त्याने स्थाविर अश्वजीत यांच्याकडुन याबाबत माहीती करुन घेतली होती. परंतु त्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची लोकांसमोर पुष्टी करायची होती.)


सच्चक म्हणाला,, सम्यक संबुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले..?


त्यावर भगवान बुद्ध म्हणतात,, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व वेदना अनित्य आहेत, रुप अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहेत.... हे सच्चका सर्व रुप अनात्म आहेत, वेदना अनात्म आहेत, विज्ञान अनात्म आहेत. संज्ञा अनात्म आहेत, संस्कार अनात्म आहेत., सर्व धर्म अनात्म आहेत.


यावर सच्चकाने प्रतिकार करताना म्हटले कि, ज्याप्रमाणे बी किंवा प्राणी पृथ्वीचा आधार घेवुन वृद्धी प्राप्त करुन घेतात.


ज्याप्रमाणे बळ लागणारी कामे पृथ्वीचा आश्रय घेवुन संपन्न केली जातात. त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा रुप, वेदना, संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांचा आश्रय घेऊन पुण्याचे सृजन करुन घेतात. सच्चक पुढे म्हणाला, माझ्या विचारांमध्ये रुप, वेदना, संस्कार, विज्ञान आणि माझा आत्मा आहे.


तेव्हा भगवंत सच्चकाला म्हणाले कि, राजा अजातशत्रु, राजा प्रसेनजीत अथवा अन्य कोणताही राजा आपल्या राज्यातील नागरीकास जिवे मारु शकतो.? जाळु शकतो.? देशाच्या बाहेर हाकलुन लावु शकतो काय.? सच्चक म्हणाला, होय हे संभव आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले कि रुप माझा आत्मा आहे, तर हा रुप तुझ्या अधिपत्याखाली आहे काय.? माझा रुप असा असेल, माझा रुप तसा असेल.. हे आपल्या अधिकारात आहे काय.?


यावर पहिल्यांदा सच्चकाने मौन पाळले, दुसऱ्यांदा विचारल्यावरही सच्चक मौन होता. तिसऱ्यांदा विचारल्यावर सच्चक म्हणाला,, नाही भगवान... आपले म्हणने सत्य आहे..


यानंतर त्यान विचारलेल्या अन्य प्रश्नांना भगवंतांनी दिलेल्या उत्तरांचा तो स्वीकार करत गेला.


वादविवादात आपणच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहोत, हा त्याचा आंधळेपणा आता त्याला दिसु लागला होता.


• वेदना, विज्ञान, संस्कार, संज्ञा हे आपल्या शक्यते पलीकडे आहे.

• रुप अनित्य आहे.

• जो अनित्य आहे, तो दुःख आहे.

• अनित्य, दुःख, परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल विचार करणे योग्य नाही.

• जी स्थीती रुपाची आहे, तिच स्थीती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या सर्वांची सुद्धा आहे.



त्यानंतर सच्चक म्हणाला, आपले श्रावक काशाप्रकारे संशयविरहीत, आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर होऊन आपल्या शासनात विहार करतात..?

भगवान म्हणाले., माझे श्रावक भुत, भविष्य आणि वर्तमानात शरीराच्या आत किंवा बाहेर, दुर किंवा बाहेर जे काही रुप, वेदना, संज्ञा, संस्कार किंवा विज्ञान आहेत, त्यांना हे माझे नाही, हे मी आहे, नाही हा माझा आत्मा आहे, हे सर्व प्रज्ञेने पाहतात.


यानंतर सच्चक म्हणाला,, भिक्षु कशाप्रकारे, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करुन अरहंतत्व प्राप्त करुन घेतो..? भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर पहिल्याप्रमाणेच दिले, सम्यक संबुद्धाने प्रभावीत होवुन त्याने भगवान बुद्धांना भिक्षुसंघासहीत जेवणाला आमंत्रीत केले...




सच्चं विहाय मति सच्चक वादकेतुं, वादाभिरोपितमनं अतिअंधभूतं । पञ्ञा पदीपजलितो जितवा मुनिंदो, तं तेजसा भवतु ते जयमंगलाननि



ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवाद परायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

१. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १ (बुद्ध धम्म म्हणजे काय....?)

२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

रोहीणीचे वडील म्हणाले,,

तु झोपताना श्रमणाचे नाव घेतेस,
उठताना श्रमणाचे नाव घेतेस,
तु केवळ श्रमणांची पुजा करतेस,
तु श्रमण बनणार, यात आता काहीही संदेह नाही....


तु नाना प्रकारची पक्वाने आणि द्रव्ये श्रमणांना दान करतेस... माझ्या प्रिय मुली, मि तुला विचारतो हे सर्व तु कशासाठी करतेस..?

ते श्रमण आळशी आहेत, ते कोणतेही श्रम न करता केवळ फुकटचे खातात. तरीसुद्धा त्यांचा एवढा आदरसत्कार का करतेस तु रोहीणी?



रोहीणी म्हणाली,,

बाबा खुप वर्षांपुर्वी तुम्ही मला श्रमणांबद्दल प्रश्न विचारला होता, कि मी श्रमणांचा एवढा आदर सत्कार का करते.?


मी श्रमाणांच्या दुर दृष्टीला पुजते, त्यांच्यातील योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या सामर्थ्याला पुजते, त्यांच्या नीतियुक्त धर्माचरणाने, त्यांच्यातील नैतिकतेने, सद्गुणांनी, सदाचाराने, कर्तव्यपारायणतेने मी प्रभावित झाले. या सर्व गुणांची मी पुजा करते.


श्रमण हे आळशी नाहीत तर कष्टाळु आहेत.

ते उत्तम कार्य करतात. त्यांनी राग, लोभ, द्वेष, तृष्णा आदि गोष्टींचा त्याग केला आहे.
यामुळे मी श्रमणांचा आदरसत्कार करते.


ते वाईट विचारांपासुन मुक्त झाले आहेत, त्यांचे आचरण शुद्ध आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या वाईट विचारांचा त्याग केला आहे, त्यामुळेच मी श्रमणांचा आदर सत्कार करते.


त्यांच्या शारीरीक क्रिया किती शुद्ध आहेत, त्यांची वाणी किती शुद्ध आहे.. त्यांचे मन किती शुद्ध आहे. ते मोत्यांप्रमाणे निष्कलंक आहेत, त्यांचे गुण निर्दोष आहेत. त्यांची शिकवण उत्कृष्ट आहे, त्यांचा धम्ममार्ग उत्कृष्ट आहे, ते आम्हाला जीवनाचे ध्येय सांगतात, ते आर्य सदाचारी आहेत. त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.



ते धम्मामध्ये जगतात, ते धम्मामध्ये राहतात, त्या आर्यांचे मन एकरुप आहे, त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.


ते सावधतेने प्रवास करतात, श्रेष्ठ उपदेश करणारे, सत्य आणि असत्य यांच्यातील भेद जाणनारे ते आर्य दुःखमुक्त आहेत, आणि दुसऱ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत, म्हणुन मी त्यांचा आदर सत्कार करते.



जेव्हा ते एखादा गाव सोडतात, त्यावेळी ते कशालाही मागे वळुन बघत नाही. किती चिंतामुक्त आहेत ते श्रमण.! यामुळे सुखी देवांचा मी आदर सत्कार करते.


ते कोठारात किंवा मडक्यात धान्य साठवुन ठेवत नाहीत, ते फक्त त्यांच्या पोटापुरतेच अन्न मागतात, यामुळे त्या आर्यांचा मी आदर सत्कार करते.


ते सोन्या चांदीची भेट स्वीकारत नाहीत, नाही कोणाकडे पैशांची मागणी करत. ते तृष्णामुक्त वर्तमानात जगतात, यामुळे त्या श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


ते वेगवेगळ्या कुटुंबातुन, वेगवेगळ्या जातीतुन, वेगवेगळ्या राष्ट्रांतुन संघात आले आहेत, परंतु तरीसुद्धा एकमेकांशी ते किती प्रेमाने आणि बंधुभावाने राहतात, यामुळे त्यांच्यातील करूणेच्या नात्याला मी वंदन करते,, आणि त्या सदाचारी आर्य श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


रोहीणीचे वडील म्हणाले,,

रोहीणी बाळा, होय खरोखरचं... आमच्या सुखासाठी आणि हितासाठी तु आमच्या कुटुंबात जन्म घेतला आहेस. तु मला प्रभावित केलेस... माझ्या मनात भगवान बुद्धांबद्दल, त्यांच्या धम्माबद्दल आणि संघाबद्दल आदराची भावना वाढीला लावलीस त्याबद्दल तुझे खुप खुप आभार...


ते खऱ्या त्यागाचे मुर्तीमंत प्रतीक आहेत. ते दान देण्यास योग्य आहेत. हे श्रमण आम्ही भेट दिलेले दान स्वीकारतील,



रोहीणी म्हणाली,,

जर आपण वेदनांना घाबरत असाल, तुम्हाला होणाऱ्या वेदना असहय्य झाल्या असतील. तेव्हा बुद्धाला शरण जा.. धम्माला शरण जा.. संघाला शरण जा.. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करा, जेव्हा तुम्ही श्रेष्ठ व सदाचारी पुरुष बनाल, तेव्हा संपुर्ण वेदनामुक्त आणि दुःखमुक्त व्हाल...


रोहीणीचे वडील म्हणाले,,


मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करतो.


पुर्वी मी एका ब्राह्मणाचा नातेवाईक होतो, आज स्वतः खऱ्या अर्थाने एक ब्राह्मण बनलो..



ज्याच्या ठाई पुर्वी अनास्था होती, तो आता आस्था दाखवु लागतो, जो आपले पुर्वजीवन सद्गुणांनी झाकुन टाकतो आणि आपल्या तारुण्यात बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, तो वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व जगाला प्रकाशीत करतो..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

वसल सुत्ताचा मराठी व इंग्रजी अनुवाद... (वृषल व्यक्तीचे गुण कोणते...?)

प्रस्तुत सुत्र हे सुत्तनिपातातील सातवे सुत्र आहे, यामधील गाथांद्वारे वृषल (नीच) व ब्राह्मण (विद्वान) कोणाला म्हणावे याबाबत भगवान बुद्ध आपले मत स्पष्ट करतात.





असे मी ऐकले आहे,,

एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे अनाथ पिंडिकाच्या जेतवनात आराम करत असताना, एकदा भगवान सकाळच्या पहिल्या प्रहरी वस्त्रपरिधान करुन श्रावस्ती मध्ये भिक्षाटनासाठी गेले असता, त्यावेळी अग्नीपुजक भारद्वाज ब्राह्मणाने त्याच्या घरी अग्नी प्रज्वलीत केला होता. त्या यज्ञात विविध प्रकारच्या आहुती दिल्या जात होत्या. भगवान बुद्ध अनुक्रमे भारद्वाजाच्या घरी गेले असता तो भगवंतांना म्हणाला,, हे मुंडका, हे चांडाळा, तु तेथेच थांब... असे म्हटल्यावर भगवान म्हणाले,, हे ब्राह्मणा! निच कोण अथवा वृषल मनुष्याचे गुण कोणते..? किंवा मनुष्याला निच बनविणाऱ्या गोष्टी कोणत्या, हे तु जाणतोस काय.? नाही भगवान त्याविषयी मला काही माहिती नाही. आपण भगवंतांनी मला उपदेशना करावी, नीच कोण आहे, वृषल कोण आहे हे मला माहीत होईल.



१. जो पुरुष दुसऱ्यांविषयी क्रोधी आहे. दुसर्याचा द्वेष करतो. पापी तसेच इर्षालु आहे. मिथ्यादृष्टीचा आणि धुर्त आहे — त्याला वृषल समजावे.


२. जो मनुष्य किंवा पशू योनीमध्ये असलेल्या प्राण्यांची किंवा पक्षांची हत्या करतो. ज्याला प्राणीमात्राविषयी दया येत नाही — त्याला वृषल समजावे.



३. जो गावांआणि शहरांना लुटतो, मनुष्यांना धरतो आणि मारतो आणि अशा प्रकारे जो अत्याचाराच्या प्रति प्रसिद्ध होतो — त्याला वृषल समजावे.



४. जो गावात आणि अरण्यात दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती हडपतो — त्याला वृषल समजावे.



५. जो दुसऱ्याकडुन कर्ज घेतो आणि परत मागीतले असता, टाळाटाळ करतो — त्याला वृषल समजावे.



६. जो दुसऱ्याच्या कोणत्याही वस्तुकरीता रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीला अडवुन मारुन घेतो — त्याला वृषल समजावे.



७. जो आपल्यासाठी किंवा दुसऱ्याकरिता किंवा धन संपत्तीकरीता विचारले असता खोटी माहीती देतो — त्याला वृषल समजावे.



८. जो बळजबरीने किंवा प्रेमाने भाऊबंदाच्या किंवा मित्रांच्या स्त्रीयांसोबत शारिरीक कामवासनेचे संबंध ठेवतो — त्याला वृषल समजावे.



९. जो आई किंवा वडिलांचे म्हातारपणामध्ये सामर्थ्य असुन सुद्धा पालन पोषण करत नाही — त्याला वृषल समजावे.



१०. जो आईवडीलांना, भावाला, बहिणीला मारतो, वाईट शब्दाने टोचुन बोलतो, त्यांचा राग करतो — त्याला वृषल समजावे.



११. ज्याला फायद्याची गोष्ट विचारली तर अहिताची सांगतो. बरोबर सांगत नाही — त्याला वृषल समजावे.



१२. जो पापकर्म करुन, लोकांनी मला जाणु नये अशी इच्छा करतो — त्याला वृषल समजावे.



१३. जो दुसऱ्याच्या घरी जाऊन चांगले स्वादिष्ट भोजन घेतो, आणि आपल्या घरी परत आल्यावर त्यांचा सत्कार करीत नाही — त्याला वृषल समजावे.



१४. जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला किंवा इतर कोणालाही खोटे बोलुन फसवितो — त्याला वृषल समजावे.



१५. जो ब्राह्मणाला किंवा श्रमणाला भोजणाच्या वेळी आल्यावर क्रोधाने बोलतो — त्याला काहीच देत नाही, त्याला वृषल समजावे.



१६. जो कोणी लाभाच्या अपेक्षेने, असत्य बोलतो — त्याला वृषल समजावे.



१७. जो गर्विष्ठ, स्वतःवरच्या गर्वाने आंधळा झालेला असतो, आणि त्या अज्ञानानेच इतरांना हीन समजतो — त्याला वृषल समजावे.



१८. जो स्वार्थी, कपटी, निर्लज्ज आणि क्रोधी आहे — त्याला वृषल समजावे.



१९. जो कोणी सम्यक संबुद्धासोबत, त्याच्या शिष्यासोबत किंवा कोणत्याही गृहस्थासोबत बोलताना वाईट शब्द वापरेल — त्याला वृषल समजावे.



२०. जो कोणी अरहंत - परिपुर्ण एक नाही, परंतु असे भासवतो तो विश्वातील सर्वात मोठा चोर आहे — त्याला वृषल समजावे.



२१. जन्माने नीच होत नाही, जन्माने ब्राह्मण होत नाही,, कर्माने नीच होतो, आणि कर्मानेच ब्राह्मण होतो...






Thus have I heard:

On one occasion the Blessed One was living near Savatthi at Jetavana at Anathapindika's monastery. Then in the forenoon the Blessed One having dressed himself, took bowl and (double) robe, and entered the city of Savatthi for alms. Now at that time a fire was burning, and an offering was being prepared in the house of the brahman Aggikabharadvaja. Then the Blessed One, while on his alms round, came to the brahman's residence. The brahman seeing the Blessed One some way off, said this: "Stay there, you shaveling, stay there you wretched monk, stay there you outcast." When he spoke thus the Blessed One said to the brahman: "Do you know, brahman, who an outcast is and what the conditions are that make an outcast?" "No, indeed, Venerable Gotama, I do not know who an outcast is nor the conditions that make an outcast. It is good if Venerable Gotama were to explain the Dhamma to me so that I may know who an outcast is and what the conditions are that make an outcast."


"Listen then, brahman, and pay attention, I will speak."


"Yes, Venerable Sir," replied the brahman.




1. "Whosoever is angry, harbors hatred, and is reluctant to speak well of others (discredits the good of others), perverted in views, deceitful — know him as an outcast.



2. "Whosoever in this world kills living beings, once born or twice born, in whom there is no sympathy for living beings — know him as an outcast.



3. "Whosoever destroys and besieges villages and hamlets and becomes notorious as an oppressor — know him as an outcast.



4. "Be it in the village, or in the forest, whosoever steals what belongs to others, what is not given to him — know him as an outcast.



5. "Whosoever having actually incurred a debt runs away when he is pressed to pay, saying, 'I owe no debt to you' — know him as an outcast.



6. "Whosoever coveting anything, kills a person going along the road, and grabs whatever that person has — know him as an outcast.



7. "He who for his own sake or for the sake of others or for the sake of wealth, utters lies when questioned as a witness — know him as an outcast.



8. "Whosoever by force or with consent associates with the wives of relatives or friends — know him as an outcast.



9. "Whosoever being wealthy supports not his mother and father who have grown old — know him as an outcast.



10. "Whosoever strikes and annoys by (harsh) speech, mother, father, brother, sister or mother-in-law or father-in-law — know him as an outcast.



11. "Whosoever when questioned about what is good, says what is detrimental, and talks in an evasive manner- know him as an outcast.



12. "Whosoever having committed an evil deed, wishes that it may not be known to others, and commits evil in secret — know him as an outcast.



13. "Whosoever having gone to another's house, and partaken of choice food, does not honor that host by offering food when he repays the visit — know him as an outcast.



14. "Whosoever deceives by uttering lies, a brahman or an ascetic, or any other mendicant — know him as an outcast.



15. "Whosoever when a brahman or ascetic appears during mealtime angers him by harsh speech, and does not offer him (any alms) — know him as an outcast.



16. "Whosoever in this world, shrouded in ignorance, speaks harsh words (asatam) or falsehood expecting to gain something — know him as an outcast.



17. "Whosoever debased by his pride, exalts himself and belittles other — know him as an outcast.



18. "Whosoever is given to anger, is miserly, has base desires, and is selfish, deceitful, shameless and fearless (in doing evil) — know him as an outcast.



19. "Whosoever reviles the Enlightened One (the Buddha), or a disciple of the Buddha, recluse or a householder — know him as an outcast.



20. "Whosoever not being an arahant, a Consummate One, pretends to be so, is a thief in the whole universe — he is the lowest of outcasts.



21. "Not by birth is one an outcast; not by birth is one a brahman. By deed one becomes an outcast, by deed one becomes a brahman.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...




Read :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

जयमंगल अष्टगाथा मधील पाचवी गाथा आपल्याला चिंचा नावाच्या स्त्री बद्दल माहीती सांगते,, या कथेत चिंचा नावाची स्त्री जैन तीर्थकांच्या सांगण्यावरुन भगवान बुद्धांवर अनैतिकतेचा आरोप करत असते.....




सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या.



लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चरित्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला. 


त्यावेळी श्रावस्तीमध्ये.. चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगीनी राहात असे. तिचा देह आणी रुप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शके.


जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. वाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली.


एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. त्यावर चिंचा ने ठिक आहे असे म्हटले व नंतर ती निघुन गेली....

स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!

जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.


नवव्या महिन्यानंतर तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणी कीटकदंशानी हात सुकवुन घेवुन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते तिथे जाऊन ति म्हणाले, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणी आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत असणे संभाव्य आहे.


चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले.


त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे,, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले.


अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात,




कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया, चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे । सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।


ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)



४. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)