धम्मदीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धम्मदीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग २ : राजा प्रसेनजीत ~ १)

प्रसेनजीत हा कोसल देशाचा राजा होता, कोसल हे राष्ट्र मगध देशाच्या उत्तरेला वसलेले होते, त्यावेळी बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. श्रावस्ती हे कोसल देशाच्या राजधानीचे शहर होते. बिंबीसार हा प्रसेनजीतच्या बहिणीचा नवरा होता, प्रसेनजीतची बहिण हि बिंबीसार राजाची मुख्य पत्नी होती. प्रसेनजीत हा वैदिक धर्माचा अनुयायी होता, तो खुप मोठे मोठे यज्ञ करायचा. तरीसुद्धा तो श्रमणांचा मान ठेवायचा. त्याच्या राजधानी मध्ये अनाथपिंडिक ज्याचे खरे नाव सुदत्त होते त्याने भगवान बुद्ध व भिक्षुसंघासाठी जेतवन नावाचा मोठा विहार बांधुन दिला, भगवान बुद्धांनी आपले उपदेश सर्वात जास्त उपदेश श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवनातच केला.



प्रसेनजीतची धम्मदीक्षा...



एके समयी भगवान बुद्ध श्रावस्ती अनाथपिंडिकाच्या जेतवनात विहार करत होते, हे जेव्हा प्रसेनजीत राजाला समजले तेव्हा तो राजेशाही इतमामासह जेतवन विहारामध्ये गेला, आणि भगवंतांना हात जोडुन वंदन करीत तो म्हणाला,,

भगवान माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य आज खोरोखर भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा शिक्षक, धर्मराज उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील...? ज्या अर्थी आपल्या पवित्र चरणांचे मला दर्शन झाले त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करु द्या.

भगवान म्हणाले,, ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामन्य माणसालाही मनःशांती लाभते.


सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाची स्थीती ओळखुन भगवान म्हणाले,,


हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य बघितला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो ; मग राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल..? आणि म्हणुन मी माझा धम्म थोडक्यात सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपुर्वक ऐकावे व आत्मसात करावे.


• आपली बरी वाईट कृत्ये नेहमी सावलीप्रमाणे आपला पाठलाग करतात.

• सर्वात अधिक गरज करुणामय ह्रदयाची आहे.

• आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे समजा., त्यांच्यावर जुलुम करु नका.

• आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा.

• कुमार्मागाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा.

• दुसऱ्यांना पायदळी तुडवुन स्वतः उच्चपदी चढू नका.

• दुःखीताना सुख द्या आणि त्याला आपला मित्र बनवा.

• तोंडपुजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकु नका.

• तपश्चर्येने स्वतःला क्लेश करुन घेण्यात काहीही लाभ नसते, म्हणुन धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा.

• दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धर्माचा विचार केल्यानेच त्यातुन आपली सुटका होऊ शकेल...

• सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते काम-वासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनांचा अवलंब करतात.

• झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहु शकतील..? जिथे वासना असते तिथे सत्य राहु शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही त्या मनुष्याची विद्वान म्हणुन कितीही त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे.

• ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करुन घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.

• हे सत्य केवळ ॠषींसाठीच नसुन प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. ॠषींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ॠषीपदाला पोहोचु शकततात.

• कामवासनेच्या भरतीपासुन सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहुन जाते, जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणु. धम्म तुम्हाला असा आदेश देतो कि, तुमच्या या शत्रूंपासुन तुम्ही आपले संरक्षण करा.

• आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणुन आपण सत्कर्मेच करावीत.

• आपल्या हातुन दुष्कृत्ये होऊ नये म्हणुन बपण आपले विचार तपासुन पहावे, कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते.

• प्रकाशातुन अंधाराकडे आणि अंधारातुन प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातुन दाट अंधाराकडे आणि संधि प्रकाशातुन उज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुद्य मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणुन तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करत राहील.

• सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करुन आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा.

• मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असु द्या. सद्वर्तनाच्या धर्म नियमांचे उल्लंघन करुन नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तुंवर अवलंबुन न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबुन ठेवा.


भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली, आणि तो भगवान बुद्धांचा उपासक झाला...


क्रमशः


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



बौद्ध धर्मानेच उत्कर्ष होणार आहे...

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)

श्रमणफळ सुत्ताचा मराठी अनुवाद (राजा अजातशत्रुची धम्मदीक्षा)

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१३

प्राचीन बौद्ध राजे.... (भाग १ : राजा बिंबीसार)






बिंबीसार हा मगध देशाचा राजा होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याचा राज्यभिषेक झाला. बिंबीसार राजाची राजधानी राजगृह होती तर त्याच्या पित्याचे नाव महापद्म असे होते. बिंबीसार हा शिशुनाग वंशाचा पाचवा राजा होता. त्याने कोसल देशाची राजकन्या (प्रसेनजीतची बहीण) कोसल्यादेवी सोबत लग्न केले होते.



मगधचे राज्य हे पुर्वीपासुनच संपन्न राज्य होते. येते वाहणाऱ्या बारमाही नद्यांमुळे शेतील योग्य पाणीपुरवठा झाल्याने धनधान्याची मुबलकता राहत असे. मगध राष्ट्राच्या शेजारी कोसल, अंग आणि वज्जी ही बलवान राज्ये होते., त्याचप्रमाणे मगधसुद्धा बलवान व्हावे अशी बिंबीसाराची महत्त्वकांक्षा होती.


बिंबीसाराने लिच्छवी राजकन्येशी विवाह केला आणि तिच्यापासुन हल आणि विहल हि दोन मुले झाली. लिच्छवी राजकन्येशी लग्न करताना त्याने चेटक राजाला सयेनाग नावाचा हत्ती व अठरा पदरी सोन्याची माळ दिली. त्यानंतर भद्र देशाच्या खेत्रा आणि चौथी राणी विदेह देशाची राजकन्या होती.



बिंबीसार राजाची प्रशासन व्यवस्था अतिशय चोख होती. तो एक शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट प्रशासक होता, गुन्हेगारांना तो कधीच क्षमा करीत नसे. बिंबीसाराच्या कारकिर्दीत कलेचा खुप प्रसार झाला होता, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही प्रसार झाला होता. मगध साम्राज्याचा खरा पाया घालणारा बिंबीसार राजा होता.





बोधीसत्त्वासोबत भेट


एकदा सिद्धार्थ गौतम कपिलवस्तुवरुन राजगृह येथे आले होते, त्यावेळी सिद्धार्थ पांडव टेकडीच्या पायथ्याशी लहानशी झोपडी तयार करुन निवास करीत होतात, एकदा बिंबीसाराने सिद्धार्थाला शहरातुन फिरताना बघितले. सिद्धार्थ पांडव टेकडीवर गेला जायला निघाला होता, सिद्धार्थाला बघुन अति आदराने आणि मोजक्याच लवाजम्यासह तो सिद्धार्थाकडे जायला निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असलेला राजा टेकडी चढुन गेला. त्याठिकाणी आसनस्थ असलेला तेजस्वी सिद्धार्थ गौतम त्याच्या दृष्टीस पडला. सिद्धार्थाचे शारिरीक सौंदर्य आणि चेहऱ्यावरील झळकणारी शांती पाहुन राजा बिंबीसार प्रेमपुर्वक आदरभावाने त्याच्याजवळ गेला आणि मोठ्या आदराने विचारपुस केली, मग राजा सिद्धार्थाजवळ बसला. आणि म्हणाला,,

माझी तुझ्या कुटुंबाशी फार मैत्री आहे, राज्यसत्तेचा उपभोग घेण्यापेक्षा संन्यासी जीवन जगण्याचा निश्चय तुझ्या मनात कसा आला.? दुसऱ्याने दिलेले अन्न ग्रहण करावे हे तुला शोभत नाही. तुला जर तुझ्या वडिलाचे राज्य नको असेल तर तु माझे अर्धे राज्य घे. धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमाला अनुसरुन वाग यामुळे मानवी जीवनाचा हेतु पुर्ण होतो. हे सर्व ऐकुन झाल्यावर सिद्धार्थाने आपल्या गृहत्यागाचे कारण सांगीतले त्यावर बिंबीसार म्हणाला, तुझे ध्येय पुर्ण झाल्यावर मला भेटण्याची कृपा कर...



सम्यक संबुद्धासोबत भेट


सिद्धार्थ गौतम ज्ञान प्राप्त होऊन सम्यक संबुद्ध झाल्यावर राजगृहात आला होता. त्याने आपल्या धर्माचा उपदेश हजार जटील साधुंना दिला होता. ही सुवार्ता ऐकुन बुद्धाविषयी लोक चर्चा करु लागले होते. बिंबीसार राजाला भगवान बुद्ध शहरात आल्याचे समजले. बिंबीसाराने विचार केला कि, अत्यंत दुराग्रही अशा जटीलांना दीक्षा देणे हि साधी गोष्ट नव्हती. तो विद्वान सर्वज्ञानी लोकांना मार्गदर्शन करणारा देव व मनुष्यांचा गुरूच असला पाहिजे आणि सत्याचाच उपदेश करीत असला पाहिजे. अशा या माणसाचे दर्शन घेणे योग्य आहे असे बिंबीसार राजाला वाटले. बिंबीसार भगवान बुद्धांकडे गेला, अभिवादन करुन त्यांच्या जवळ बसला, भगवंतांनी त्याला उपदेश केला. भगवंतांचा उपदेश ऐकुन मगध राजा बिंबीसार म्हणाला,,

भगवंत पुर्वी राजपुत्र असताना माझ्या पाच इच्छा होत्या आता त्या पुर्ण झाल्या आहेत.



१. पुर्वी मी राजपुत्र असताना मला राज्यभिषेक केला तर फार चांगले होईल, ती माझी इच्छा पुर्ण झाली.

. एखादा सम्यक संबुद्ध माझ्या राज्यात आला तर किती चांगले होईल. ती देखील इच्छा पुर्ण झाली आहे.

३. मला त्या भगवंताची सेवा करायला मिळाली तर चांगले होईल.

४. भगवंतांनी आपला धर्म शिकवावा

५. भगवंताचा धर्म मला कळावा.





अशा माझ्या पाच इच्छा होत्या व त्या पुर्ण झाल्या आहेत. भगवंतांनी मला आपला आजन्म शरण आलेलाउपासक म्हणुन स्वीकार करावा. भगवान बुद्धाने बिंबीसाराला बौद्ध उपासक बनविले. बिंबीसाराने बुद्धाच्या धर्माचा स्वीकार केला... राजा बिंबीसार भगवान बुद्धाचा श्रेष्ठ उपासक आणि धम्माचा प्रमुख आधार होता. उपासक झाल्यावर बिंबीसाराने भगवंतांना भिक्षु संघासोबत जेवनाचे आमंत्रण दिले व स्वतःच्या हाताने जेवन वाढले व त्याचे वेळूवन भगवान बुद्धांना व भिक्षुसंघाला दान दिले. 


बिंबीसार राजा हा बौद्ध धर्माचा निष्ठावान उपासक होता. त्याने बौद्ध धर्माचे धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले. तेव्हापासुन उपोसध पर्व सुरु झाले. भिक्षु संघ निरोगी राहावा म्हणुन त्याने अनेक उपाययोजना केल्या. बिंबीसार राजाचा डॉ. जीवक नावाचा राजवैद्य बौद्ध उपासक होता. तो अतिशय विद्वाण असा डॉक्टर होता.


एके दिवशी राजा बिंबीसाराने भगवान बुद्धाला पायाच्या नखाचा तुकडा मागितला व त्या नखाच्या तुकड्यावर राजाने एक स्तुप बांधला. राजघराण्यातील स्त्रीया दररोज संध्याकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करुन त्या स्तुपावर फुले चढवित आणि दीप प्रज्वलीत करीत.



अशाप्रकारे धर्मप्रचाराची सुरुवात राजा बिंबीसाराने स्वतःच्या घरातुन केली त्यामुळे बिक्षु संघाला आणि धर्म प्रचाराच्या कार्याला अनुकुलता प्राप्त झाली. बुद्धाच्या काळातच बिंबीसार राजाने धर्मप्रचाराकरिता चांगलीच मदत केली........


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

मराठी धम्मपद

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

रोहीणीच्या वडिलांची धम्मदीक्षा...

रोहीणीचे वडील म्हणाले,,

तु झोपताना श्रमणाचे नाव घेतेस,
उठताना श्रमणाचे नाव घेतेस,
तु केवळ श्रमणांची पुजा करतेस,
तु श्रमण बनणार, यात आता काहीही संदेह नाही....


तु नाना प्रकारची पक्वाने आणि द्रव्ये श्रमणांना दान करतेस... माझ्या प्रिय मुली, मि तुला विचारतो हे सर्व तु कशासाठी करतेस..?

ते श्रमण आळशी आहेत, ते कोणतेही श्रम न करता केवळ फुकटचे खातात. तरीसुद्धा त्यांचा एवढा आदरसत्कार का करतेस तु रोहीणी?



रोहीणी म्हणाली,,

बाबा खुप वर्षांपुर्वी तुम्ही मला श्रमणांबद्दल प्रश्न विचारला होता, कि मी श्रमणांचा एवढा आदर सत्कार का करते.?


मी श्रमाणांच्या दुर दृष्टीला पुजते, त्यांच्यातील योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याच्या सामर्थ्याला पुजते, त्यांच्या नीतियुक्त धर्माचरणाने, त्यांच्यातील नैतिकतेने, सद्गुणांनी, सदाचाराने, कर्तव्यपारायणतेने मी प्रभावित झाले. या सर्व गुणांची मी पुजा करते.


श्रमण हे आळशी नाहीत तर कष्टाळु आहेत.

ते उत्तम कार्य करतात. त्यांनी राग, लोभ, द्वेष, तृष्णा आदि गोष्टींचा त्याग केला आहे.
यामुळे मी श्रमणांचा आदरसत्कार करते.


ते वाईट विचारांपासुन मुक्त झाले आहेत, त्यांचे आचरण शुद्ध आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या वाईट विचारांचा त्याग केला आहे, त्यामुळेच मी श्रमणांचा आदर सत्कार करते.


त्यांच्या शारीरीक क्रिया किती शुद्ध आहेत, त्यांची वाणी किती शुद्ध आहे.. त्यांचे मन किती शुद्ध आहे. ते मोत्यांप्रमाणे निष्कलंक आहेत, त्यांचे गुण निर्दोष आहेत. त्यांची शिकवण उत्कृष्ट आहे, त्यांचा धम्ममार्ग उत्कृष्ट आहे, ते आम्हाला जीवनाचे ध्येय सांगतात, ते आर्य सदाचारी आहेत. त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.



ते धम्मामध्ये जगतात, ते धम्मामध्ये राहतात, त्या आर्यांचे मन एकरुप आहे, त्यामुळे मी त्यांचा आदर सत्कार करते.


ते सावधतेने प्रवास करतात, श्रेष्ठ उपदेश करणारे, सत्य आणि असत्य यांच्यातील भेद जाणनारे ते आर्य दुःखमुक्त आहेत, आणि दुसऱ्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे आहेत, म्हणुन मी त्यांचा आदर सत्कार करते.



जेव्हा ते एखादा गाव सोडतात, त्यावेळी ते कशालाही मागे वळुन बघत नाही. किती चिंतामुक्त आहेत ते श्रमण.! यामुळे सुखी देवांचा मी आदर सत्कार करते.


ते कोठारात किंवा मडक्यात धान्य साठवुन ठेवत नाहीत, ते फक्त त्यांच्या पोटापुरतेच अन्न मागतात, यामुळे त्या आर्यांचा मी आदर सत्कार करते.


ते सोन्या चांदीची भेट स्वीकारत नाहीत, नाही कोणाकडे पैशांची मागणी करत. ते तृष्णामुक्त वर्तमानात जगतात, यामुळे त्या श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


ते वेगवेगळ्या कुटुंबातुन, वेगवेगळ्या जातीतुन, वेगवेगळ्या राष्ट्रांतुन संघात आले आहेत, परंतु तरीसुद्धा एकमेकांशी ते किती प्रेमाने आणि बंधुभावाने राहतात, यामुळे त्यांच्यातील करूणेच्या नात्याला मी वंदन करते,, आणि त्या सदाचारी आर्य श्रमणांचा मी आदरसत्कार करते.


रोहीणीचे वडील म्हणाले,,

रोहीणी बाळा, होय खरोखरचं... आमच्या सुखासाठी आणि हितासाठी तु आमच्या कुटुंबात जन्म घेतला आहेस. तु मला प्रभावित केलेस... माझ्या मनात भगवान बुद्धांबद्दल, त्यांच्या धम्माबद्दल आणि संघाबद्दल आदराची भावना वाढीला लावलीस त्याबद्दल तुझे खुप खुप आभार...


ते खऱ्या त्यागाचे मुर्तीमंत प्रतीक आहेत. ते दान देण्यास योग्य आहेत. हे श्रमण आम्ही भेट दिलेले दान स्वीकारतील,



रोहीणी म्हणाली,,

जर आपण वेदनांना घाबरत असाल, तुम्हाला होणाऱ्या वेदना असहय्य झाल्या असतील. तेव्हा बुद्धाला शरण जा.. धम्माला शरण जा.. संघाला शरण जा.. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करा, जेव्हा तुम्ही श्रेष्ठ व सदाचारी पुरुष बनाल, तेव्हा संपुर्ण वेदनामुक्त आणि दुःखमुक्त व्हाल...


रोहीणीचे वडील म्हणाले,,


मी बुद्धाला शरण जातो, मी धम्माला शरण जातो, मी संघाला शरण जातो. आणि सदाचारी बनण्याची प्रतीज्ञा करतो.


पुर्वी मी एका ब्राह्मणाचा नातेवाईक होतो, आज स्वतः खऱ्या अर्थाने एक ब्राह्मण बनलो..



ज्याच्या ठाई पुर्वी अनास्था होती, तो आता आस्था दाखवु लागतो, जो आपले पुर्वजीवन सद्गुणांनी झाकुन टाकतो आणि आपल्या तारुण्यात बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण जातो, तो वादळातुन मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व जगाला प्रकाशीत करतो..


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बुद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी

५. भगवान बुद्धांचा शीलमार्ग......

६. मराठी धम्मपद