भगवान बुद्धांचे विरोधक आणि टीकाकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भगवान बुद्धांचे विरोधक आणि टीकाकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०१४

भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन आणि निर्माण होणारे गैरसमज


इतिहासात डोकावुन बघितले तर असे आपल्या लक्षात येईल की प्राचीन काळापासुन धर्माच्या विरोधकांनी बुद्ध, धम्म आणि संघाच्या बाबतीत अफवा पसरवायला सुरुवात केली होती. भगवान बुद्ध, धर्म आणि संघाबद्दल लोकांच्या मनात आकस निर्माण करण्यासाठी "जेणे करुन लोक बुद्ध, धर्म आणि संघाची निंदा करोत" या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवुन धर्माच्या विरोधकांनी लोकांची दिशाभुल करण्या करीता अनेक प्रकारच्या अफवा पसरविल्या, धर्माचा अपप्रचार केला.


पशू पेक्षाही रानटी जीवन जगणाऱ्या माणवाला मानवता शिकविणाऱ्या धर्ममार्गाला त्याच्याच मायदेशातुन हद्दपार करुन त्यांच्या अशा प्रयत्नामध्ये थोड्याफार प्रमाणात का म्हणता येईना पण ते यशस्वी झाले. शतकानुशतके आपल्या मातृभुमीपासुन दुर राहिलेल्या ह्या कल्याणकारी धर्माचे त्याच्या मायदेशात मोठ्या थाटामध्ये स्वागत झाले. परंपरेने चालत असलेल्या अपप्रचार अनेक माध्यमांद्वारे दुर होऊ लागले. असे असले तरी सुद्धा धर्माच्या संबंधी अपप्रचाराच्या द्वारे पेरण्यात आलेले अनेक चुकीचे समज आजही आपल्याला दिसुन येतात. एक धर्म अनुयायी म्हणुन अशा चुकीच्या प्रचारांना दुर करणे आपले एक कर्तव्य समजुन "भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन" या विषयावर एक लेख लिहित आहे. या लेखा द्वारे मिळणाऱ्या महत्वपुर्ण उपदेशाला ग्रहण करा....


भगवान बुद्धांचे शेवटचे जेवन याबाबतीत प्रामुख्याने असे सांगीतले जाते की त्यांनी डुकरांचे मांस खाऊन आपली जीवनयात्रा संपविली. अलीकडेच काही बामसेफी विचारजंत असा प्रचार करताना आपल्याला दिसतात कि चुंद नावाच्या लोहाराने ब्राह्मणांच्या कडुन बुद्धांची हत्या करण्याची सुपारी घेतली होती. त्या अनुशंगाने त्याने अन्नामध्ये विष मिसळवुन ते अन्न भगवान बुद्धांना खायला दिले आणि अशा प्रकारे त्यांची हत्या केली गेली. माझ्यामते ही दोन्ही मते खोडसाळ आणि धर्म विरोधी आहेत...


त्यासाठी आपण पुढील गोष्टींचा विचार करु :

१. ज्या उपासकाने भगवान बुद्धांना शेवटचे अन्न दान दिले त्याचे 'चुंद' हे नाव डुकरांची कत्तल करणाऱ्या व्यक्तीच्या नावासोबत गोंधळात पडले. इथे लोक हे विसरतात की - तो डुकरांची कत्तल करुन त्यांचे मांस विकणारा 'चुंद' नावाचा व्यक्ती हा भगवान बुद्धांच्या महापरीनिर्वाणाच्या आधीच मरण पावलेला आहे.

२. ज्या उपासकाने भगवान बुद्धांना शेवटचे अन्न दान दिले त्यांचे नाव 'चुंद करमारपुत्र' होते, जो व्यवसायाने सोनार होता, दागीन्यांचा व्यापारी होता. कुशीनाऱ्याच्या वाटेवर पावा येथील ह्याच उपासकाच्या आरामांत भगवान बुद्धांनी रात्र घालविली.

३. तीन महिन्यांच्यापुर्वी भगवान बुद्धांनी सांगीतले होते कि येणाऱ्या वैशाख पौर्णिमेला कुशीनारा येथे त्यांचे महापरिनिर्वाण होणार आहे. कारण सहा महिन्यांपासुन भगवान बुद्धांचे प्रकृती खालाविली होती, पोटाच्या विकाराने ते अशक्त बनले होते. भगवान बुद्धांची बिघडलेल्या तब्येतीला पाहुन 'चुंद करमारपुत्त' ह्यांनी अतुल नावाच्या तत्कालीन प्रसीद्ध डॉक्टरांच्या सल्ल्याने एक औषधीयुक्त पदार्थ बनविला ज्यामध्ये स्वतः भगवान बुद्धांचा सुद्धा समावेश होता.

४. त्या औषधीयुक्त पदार्थाला पाली भाषेमध्ये 'सुकर मद्दव' असे म्हटले गेले. इथुनच सर्व गोची झाली.

५. सामान्यतः 'सुकर' या शब्दाचा अर्थ डुक्कर असा घेतला जातो. या शब्दसाधर्म्यामुळे धर्माच्या विरोधकांनी 'डुकराच्या भाजीची' दंतकथा रचली.


सामान्यतः कोणत्याही व्यक्तीला जो पोटाच्या विकाराने ग्रस्त आहे पचायला जड असल्यामुळे त्याला मांस खायला दिले जात नाही. दुसरीकडे उच्चवर्णीय भारतीय समाज (क्षत्रीय, ब्राह्मण, वैश्य) हे सर्व शाकाहारी होते. याच धर्तीवर निःशंक शाकाहारी असलेला 'चुंद करमारपुत्र' सारखा श्रीमंत व्यापारी मांस वाढणे शक्य नाही ते सुद्धा बुद्धांना जे त्यांच्या समाजात पाप समजले जाते.


नेपाळ आणि भारतातील गोरखपुर (पावा आणि कुशीनारा गोरखपुर जिल्ह्यामध्ये येतात) जिल्ह्यामध्ये राहणारे आत्तासुद्धा अशा अनेक प्रकारचे मश्रूम खातात.

१. सुकर मद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर काही डुकरे चिखल करुन तिथे घाण करतात, अशा जमीनीवर जे मश्रूम उगविले जातात त्याला सुकर मद्दव असे म्हणतात.

त्याचप्रमाणे :

२. अजा मद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर काही बकरे चिखल करुन घाण करतात आणि त्या जमीनीवर जे मद्रव उगवतात त्यांना अजा मद्दव असे म्हणतात.


३. गोमद्दव : एखाद्या विशीष्ट जमीन पट्ट्यावर चिखल करुन गायी तिथे घाण करतात अशा जमीनीवर जे मद्रव उगवतात त्यांना गोमद्दव असे म्हणतात.

४. बेलुवमद्दव : काही विशीष्ट मद्रव वेळु च्या झाडाखाली उगवतात त्यांना बेलुवमद्दव असे म्हणतात.


कुशीनाऱ्याचे आदरणीय महापंडीत अच्छुतानंद थेरो, बुद्धमित्त थेरो, काठमांडु चे अमृतानंद थेरो, लुंबीनी चे मैत्री थेरो आणि अनेकांच्या मते सुकर मद्दव हा अत्यंत पचनशील पदार्थ आहे जो पोटाच्या विकारग्रस्तांना दिला जातो. नेपाळ आणि परीसरात रुग्णांसाठी आजही औषधी म्हणुन ह्या पदार्थाचा वापर केला जातो.


सुकर मद्दव प्रमाणेच पोटाच्या विकारावर औषधीयुक्त असा पदार्थ अस्तित्वात आहे ज्याला सुकर बन असे म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये त्याला ‘Hog Mushrooms’ असे म्हणतात.


अशा प्रकारचे मद्रव अत्यंत दुर्मीळ आहेत. जे उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, कमकुवत दृष्टी इत्यादी आजारांवर सहजपणे मात करु शकते.


वरील सर्व पुरावे आपल्याला सांगतात की भगवान बुद्धांनी आपल्या अंतीम जेवनामध्ये औषधीयुक्त सुकर मद्रवाचे सेवन केले होते., डुकराच्या मांसाचे नाही. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्या शेवटच्या जेवनामध्ये डुक्कराच्या मांसाचे सेवन केले नव्हते हा प्रश्न निकालात येतो.




तर जे कोणी बामसेफी विचारांचे लोकं हा प्रचार करतांना दिसतात की - चुंदाने ब्राह्मणांच्या सांगण्यावरुन बुद्धांची हत्या केली होती. त्यांचा हा अपप्रचार मला वरील प्रचारापेक्षा घातक वाटतो., माझ्यामते तर हा धर्मद्रोह आहे. अशा अपप्रचारकांनी सुद्धा लक्षात ठेवावे कि, स्वतः भगवान बुद्धांनी म्हटले आहे - ना कोणी मार किंवा ब्रह्मा, ना कोणी श्रमण किंवा ब्राह्मण, देवांच्या सहित मनुष्य सुद्धा बुद्धांची हत्या करु शकत नाही....

एवढेच नाही तर संबोधी प्राप्तीच्या वेळेस सुजाताने दिलेली खिर आणि चुंद कारमार पुत्र यांच्याद्वारे दिलेले सुकरमद्दव हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आहेत...

अशा अपप्रचारांना बळी पडलेले तसेच अपप्रचार करणारे या सर्व गोष्टींचा विचार करतील अशी आशा आहे....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

सम्राट अशोक (भाग १ : शंका निरासन)


आजकाल काही लोक महान तत्त्वज्ञानी असल्याचा बुरखा पांघरुन फेसबुकवर स्वतःच्याच सोयीचे लिहिताना दिसतात, त्यात संशोधन वगैरे काहीच नसते, तर विशिष्ट समाजाबद्दल अथवा धर्माबद्दल द्वेष अथवा चुकीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न त्यातुन दिसत असतो.. असो..

अशाच प्रकारचे वक्तव्य एक स्वतःला महान तत्त्वज्ञानी समजणाऱ्याने केले, तो म्हणतो..





• पियदस्सी (अशोक) हा बौद्ध राजा होता याला बौद्ध ग्रंथांशिवाय काहीही पुरावा नाही. 

• शिलालेखात त्या राजाचे नाव उपाधी म्हणून देवानाम पियं पियदस्सी असे येते. आता जो धर्म देवच मानत नाही त्या धर्माचा अनुयायी स्वत:ला 'देवानाम पियं' असे कशाला म्हणवून घेईल?

• तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही...




हे सर्व आरोप अगदी चुकीची व बिनबुडाचे आहेत. बहुतांश वेळा कमी अथवा चुकीच्या माहीतीमुळे असले प्रकार घडत असतात,, परंतु लोकांनी अशा फसव्या माहीतीवर विश्वास न ठेवता, सत्य काय आहे याची सहानिशा करावी...

तर सत्य काय आणि असत्य काय हे जाणण्यासाठी आपण अशोकाच्या शिलालेखाचा उपयोग पुरावा म्हणुन घेवुया..








१. पियदस्सी (अशोक) हा बौद्ध राजा होता याला बौद्ध ग्रंथांशिवाय काहीही पुरावा नाही..



सम्राट अशोकाने वा पियदस्सीने कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला असे एका शिलालेखावरुन समजते. कलिंग युद्धानंतर आपल्याला पश्चाताप झाला असल्याचे सांगताना तो राजा लिहितो.. देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या आठ वर्षांनंतर कलिंग राष्ट्र जिंकला, त्या युद्धामध्ये दिड लाख लोक बेघर झाले, एक लाखाच्या वर लोक मारले गेले. कलिंग जिंकल्यानंतर देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजा धर्म शिक्षेने प्रभावित झाला, आणि कलिंगच्या युद्धाने झालेल्या हानीमुळे त्याला खुप पश्चाताप झाला...



बैराट जवळील भाब्रु येथील एका लघुगिरिलेखात राजा लिहितो, प्रियदर्शी, मगधचा राजा, संघाला वंदन करतो, आणि त्यांच्या हिताची व सुखाची कामना करतो. तुम्हाला माहित आहे आदरणीय गुरु माझी बुद्ध, धम्म व संघावर किती श्रद्धा आहे. बुद्धाने जे काही सांगीतले ते उत्तम सांगीतले.


या शिलालेखावरुन आपल्याला समजते कि सम्राट प्रियदर्शी हा बौद्ध होता.


बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर सम्राट प्रियदर्शी (अशोक) त्यांचे धम्मगुरु महास्थाविर मोगलीपुत्त तिस्स यांच्या उपदेशानुसार आचार्य उपगुप्त यांच्या मार्गदर्शनात ते धर्मयात्रेला जातात सर्वप्रथम ते लुंबिनीला जातात, राजाने बुद्ध जन्मस्थानाची पुजा केल्यावर तिथे के शिला स्तंभावर एक अभिलेखो खोदतो. ति गाथा मला पाठ आहे म्हणुन सांगतो



देवानं पियेन पियदसिन वीसतिवसाभिसि तेन ‬अतन आगाच महीयिते हिद बुधे जाते सक्यमुनीति ‬सिलाविगडभीचा कालापित सिलाथभे च उसपापिते हिद भगवं जातेति लुंमिनिगामे उबलिके कटे अठभागिये च 


अर्थ : देवांच्या प्रिय प्रियदर्शी राजाने आपल्या राज्यभिषेकाच्या वीस वर्षानंतर स्वतः येथे येऊन या स्थानाची पुजा करतो कारण इथेच भगवान बुद्धांचा जन्म झाला. इथे दगडाची भिंत बांधली गेली आणि शिलास्तंभ खोदला गेला, या गावात भगवान बुद्धांचा जन्म झाला असल्या कारणाने लुंबीनी गाव करमुक्त करतो आणि आपल्या उत्पन्नाचा आठवा भाग या गावाला देतो...



या शिलालेखावरुनच भगवान बुद्धांचा जन्मस्थान लुंबीनी मानला गेला.




हे शिलालेख वाचल्यावरच समजुन येते कि, सम्राट प्रियदर्शी (अशोक) हा बौद्ध सम्राट होता... लुंबिनीवरुन सम्राट कपिलवस्तुला आले. कपिलवस्तु हि राजा शुद्धोधनाची राजधानी होती. कपिलवस्तुवरुन धर्मयात्रा बुद्धगयेस गेली. सम्राटांनी बोधीवृक्षाची पुजा केली ज्या वृक्षाखाली बसुन सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध झाले. सम्राटाने बुद्धगयेस एक भव्य विहार बांधला. गयेचा तो महाबोधी महाविहार आजही तिथे आहे. 


बुद्धगयेवरुनसारनाथला सम्राटाची धर्मयात्रा आली, सम्राटाने येथेही स्तुप व विहार बंधले. सारनाथ येथील स्तंभावर कोरलेले चारही दिशांना गर्जना करणारे चार सिंह व खाली धम्मचक्र हे भारताने आपली राष्ट्रीय प्रतिके म्हणुन स्वीकारली आहेत. 


वरील सर्व पुराव्यांवरुन सिद्ध होते कि सम्राट प्रियदर्शी (अशोक) हा एक बौद्ध सम्राट होता..







२. तरीही जे लोक पियदस्सीलाच अशोक मानतात, त्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की पियदस्सीच्या एकाही शिलालेखावरून तो बौद्ध होता असे सिद्ध करता येत नाही....




वरील पुराव्यांनिशी हे सिद्ध होते कि प्रियदर्शी हा एक बौद्ध सम्राट होता, मग असल्या बिनबुडांच्या आरोपात किती तथ्य आहे हे आपल्याला समजते. दुसरा प्रश्न हा कि राजा प्रियदर्शी हाच राजा अशोक होता, असे एकाही शिलालेखावरुन सिद्ध होत नाही असे टिकाकारांचे म्हणणे आहे.


१९१५ साली कर्नाटक राज्यातील रायचुरा जिल्ह्यातील मास्की या गावात एक शिला लेख सापडला, त्या शिलालेखामध्ये सामान्यपणे लिहिल्या जाणार्या 'देवानांपिय पियदसी' ऐवजी 'देवानांपिय असोकस' असा उल्लेख आढळला. तर बेल्लारी जिल्ह्यातील असलेल्या एका गावात 'देवानांपिय पियदस्सी' ऐवजी 'राजा असोको देवानांपियो' असा उल्लेख आढळला.


तर १९५५ साली मध्यप्रदेशात सापडलेल्या शिलालेखात 'देवानांपियस्स पियदसिनो असोकराजस' असा उल्लेख आढळला यावरुन कोणीही म्हणु शकेल कि प्रियदर्शी आणि अशोक हि एकाचीच नावे आहेत. मग स्वतःला महान तत्त्वज्ञानी समजणाऱ्यांनी हे न समजुन घेता खोटा प्रचार का करावा...?


वरील दिलेल्या पुराव्यांनी हे सिद्ध होते कि प्रियदर्शी आणि अशोक हि एकाच व्यक्तीची दोन नावे आहेत. आणि महान सम्राट अशोक हा एक बौद्ध सम्राट होता.. तरीसुद्धा वाचकांना त्यांच्या काही शंका असतील, त्यांचे काही प्रश्न असतील, तर अवश्य विचारावीत.....


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

प्रतिक्रियांना प्रत्युत्तर... (भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक)

काही दिवसांपुर्वी मी माझा (भगवान बुद्ध : सत्याचा सर्वोत्तम शिक्षक ) या नावाने लेख लिहिला होता, तो सोबत दिलेल्या लिंकवर जाऊन वाचु शकता...



हा लेख प्रकाशीत होताच समाजातील विविध स्तरांवरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रीया यायला लागल्या. आपल्या देशातील विविधतेप्रमाणे सर्वांच्या प्रतिक्रियांमध्ये विविधता होती, परंतु एकता कुठेच दिसत नव्हती, हा लेख वाचुन काही बुद्धद्वेष्ट्यांनी माती खाल्लीच, तर काहींनी भाषाशुद्धीकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा पराक्रम केला. या सर्वांना प्रतिउत्तर देण्याएवढी यांची लायकी तर नाही आहे, परंतु बुद्धांबद्दल कोणाच्या मनात किंचितही संभ्रम असेल तर तो दुर व्हायला हवा असे मी माझे कर्तव्य मानुन हा लेख लिहित आहे.



सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे कि प्रस्तुत लेख हा भगवान बुद्धांचे गुण दर्शविणारा आहे. त्याच्यामध्ये गणपतीच्या आरतीसारखी कोणाची काल्पनीक थोरवी सांगीतलेली नाही, तर सम्यक संबुद्धाचे गुण सांगीतलेले आहेत.


हा सम्यक संबुद्ध म्हणजे कोण.,? सिद्धार्थ गौतम का.? नाही.. सम्यक संबुद्ध हे एक पद आहे याचा अर्थ होतो संपुर्ण जागृत असा. ह्या विश्वाचे सत्य जाणणारा. तो कोणी ईश्वर नव्हे, त्याचा अवतार किंवा दुतही नव्हे. तर सम्यक संबुद्ध हे एक पद आहे, ते आपल्यासारखा कोणताही मनुष्य भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेल्या धम्ममार्गावर चालुन प्राप्त करु शकतो... आणि ते प्राप्त करण्यापुर्वी जे गुण कोणत्याही मानवामध्ये येण्याची गरज आहे. ते गुण मी मागील लेखामध्ये सांगीतले आहेत. त्याचा मुख्य अर्थ लक्षात न घेता कोणीही वेड्यांप्रमाणे संदर्भहीन टीका का करावी..? कदाचित टिकाकार वेडे तर नसतील ना..? नाही ते वेडे तर मुळीच नाहीत. परंतु त्यांच्या मनात भगवान बुद्धांच्या प्रती असलेल्या धर्मद्वेषामुळे ते मनुष्य लोक सोडुन असुर लोकांत वास करत आहेत. (असुर म्हणजे क्रोधी व भांडखोर जीव, आता असुरांच्या गुणांवर लेख लिहिण्याची गरज पडु नये, नाहीतर असुर गुण लिहिल्यावर तो तुम्हाला तुमचा अपमान वाटायचा.)



सम्यक संबुद्धाचे हे सर्व गुण वाचुन मार आणि असुर लोक म्हणतात,,


बुद्धाने कुठला शोध लावला आहे..? ज्याला बुद्धाच्या धर्माबद्दल 'अ' सुद्धा माहीत राहत नाही ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, परंतु आपण महाधर्मज्ञानी आहोत असे भासवतात... तसे बुद्धाने कुठला शोध लावला, हे मारांना आणि असुरांना सुरुवातीला समजणे कठीण जाते, परंतु मी मनुष्याच्या नात्याने काही असुरांना मनुष्यत्वामध्ये आणण्याचा प्रयत्न करुन पाहतो, तर महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाइन भगवान बुद्धांबाबत म्हणतात...



"भविष्याचा धर्म हा विश्वव्यापी धर्म राहणार आहे. त्यामुळे माणसाचा वैयक्तिक ईश्वर मागे पडून आणि धार्मिक कट्टरता तसेच धर्मशास्र या गोष्टी मागे पडतील. तो धर्म भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही विषयांना व्यापेल आणि तो धार्मिकदृष्टीने भौतिक आणि आध्यात्मिक बाबीँचे ऐक्य निर्माण करणारा अर्थपूर्ण असेल. बौध्द धर्म हा वरील कसोट्यांना पूर्णपणे उतरतो आणि जर कोणता धर्म आधूनिक विज्ञानाच्या कल्पनांशी सूसंगत असेल तर तो बौध्द धर्मच होय. बौद्ध धर्मात मानवाला व आधुनिक विज्ञानाला पडलेल्या सर्व गरजा भागविण्याचे सामर्थ्य आहे. माझा जन्म ख्रिश्चन धर्मात झालेला असला तरी मी धार्मिक व्यक्ति नाहीय. परंतू जर मी तसा(धार्मिक) झालो तर मी बौध्दच होईल !"


--अल्बर्ट आइनस्टाईन



आईनस्टाईन म्हणतात,, मानवाला पडलेल्या पुर्ण प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही, परंतु बुद्धाच्या धर्मात एवढे सामर्थ्य आहे..

एवढा मोठा शास्त्रज्ञ जो भगवान बुद्धांना जगातील पहिला वैज्ञानीक मानतो., असे का..? तुम्हा असुरांनुसार भगवान गौतम बुद्धांनी कोणताचा शोध लावला नसेल म्हणुन काय..? जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीबद्दल संपुर्ण ज्ञान नसेल, तर आपल्या ठाई असलेल्या अर्धवट ज्ञानाच्या बळावर हे असुर लोक असले बिनबुडाचे आरोप का करतात..?



भगवान बुद्धांनी फार मोठे संशोधन केले आहे, आपल्या मनावर होणाऱ्या आजारांना कशाप्रकारे मात देतायेईल, याचा मार्ग सांगीतला. काही असुर म्हणत होते कि, बुद्धाच्या धर्माची आणि विज्ञानाची तुलना कशाला करता,..? खरंतर मी कधीच तुलना केली नव्हती जे काही सांगीतले ते बुद्धाचे गुण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असली टिका करणारे हेच असुर वेदातील विज्ञान, इत्यादी विषयांवर निबंध लिहित असतात... असो..


तर काही भाषाशुद्धीवाले होते, जे मुख्य मुद्यांवर प्रतिक्रिया न देता काना, मात्रा, उकार इत्यादी चुकींवर शुद्धलेखनाच्या चुकींवर लक्ष वेधुन घेतात... अशा विचारसरणीचा मी धिक्कार करतो...



आणि भगवान बुद्धांना जातीय कक्षेत मांडुन, समाजात जातीय द्वेष, धर्मद्वेष... पसरवु पाहणाऱ्या सर्व जातीय वादी व धर्मांध लोकांचा जाहीर निषेध करतो.... परंतु हे सर्व असुर प्रवृत्तीचे जातीय वादी व धर्मांध सर्व प्रकारच्या दुराचाराचा मार्ग सोडुन एक दिवस बुद्ध भगवंतांनी सांगीतलेल्या सदाचाराच्या मार्गावर येतील अशी खात्री आहे, म्हणुन मी आपल्या मंगल मैत्रीची कामना करतो....



भगवान बुद्धांनी ब्रह्मजाल सुत्तामध्ये सांगीतलेल्याप्रमाणे,, कोणताही व्यक्ती बुद्ध, धर्म व संघाची निंदा करत असेल तर त्याच्याशी वैरभावना ठेवु नये, त्याच्याप्रती असंतोषाने वागु नये, नाही मनात त्याचा कोप करावा. त्याने आपलीच हानी होते. आपण सत्याचा शोध घ्यायला हवा. ते जे काही बोलत आहेत ते सत्य आहे कि असत्य हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा. (म्हणुनच मनात निर्माण झालेले संभ्रम दुर करण्यासाठी हा लेख लिहिण्यात आला आहे. तेव्हा वरील लेखामध्ये ज्यांच्या साठी असुर हा शब्द वापरला आहे, त्यांच्या प्रती लेखकाच्या मनात कोणतीही द्वेष भावना नाही आहे, हे समजुन घ्यावे...)



मंगल मैत्री...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :


१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)

२. मराठी धम्मपद

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ नाथपुत्रावर विजय)

सच्चक हा तरूण निर्गंथ दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. तो वादविवादात अतिशय पारंगत बनला होता, त्याला विविध प्रकारच्या विद्या येत होत्या. त्याला ४ मोठ्या बहिणी होत्या त्या सुद्धा त्यांच्या पालकांनी शिकविलेल्या एक हजार विद्यांमध्ये पारंगत बनल्या होत्या. परंतु महास्थाविर सारीपुत्र यांच्यासोबत वादविवादात झालेल्या पराभवामुळे त्यांनी भिक्खुणी संघात प्रवेश केला. आणि खुप कमी वेळात अरहंतपद प्राप्त करुन घेतले. सच्चक हा त्यांच्या भावंडांपैकी सर्वात हुशार होता. त्याने आपल्या पालकांकडुन हजार प्रकारच्या विद्याच नव्हे तर अनेक प्रकारच्या विद्या त्याला येत होत्या. तो आपल्या हुशारीने आंधळा बनला होता. तो लिच्छवीच्या राजकन्येचा शिक्षक म्हणुन वैशालीला रहायचा....



तो स्वतःबद्दल जाहीरपणे सांगायचा कि, मी वादविवादात माझ्यापेक्षा पारंगत या जगात दुसरा कोणी सापडायचा नाही. तो स्वतःला अतिशय विद्वान आणि पवित्र समजायचा. वैशाली शहरात तो जाऊन अशा प्रकारच्या बढाया मारताना तो नागरिकांना म्हणायचा 


मी अशा एकाही पंथाच्या नायकाला बघु शकत नाही कि जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तो कोणत्या संघाचा नायक असो, कोणता तपस्वी असो, एवढेच नव्हे तर स्वतः सम्यक संबुद्ध सुद्धा असो,, माझ्यासमोर कोणाचे काहीच चालत नाही..



एके दिवशी शहरातुन भटकत असताना त्याने स्थाविर अश्वजीत यांना बघितले. ते भिक्षाटन करत होते. तेव्हा सच्चक अश्वजीत यांना भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाबद्दल विचारले आणि भगवान बुद्धांसोबत वादविवाद करुन त्या वादविवादात त्यांना हरविण्याची इच्छा प्रगट केली.


भगवान बुद्धांच्या अनित्यवाद, अनात्मवाद, दुःख, इत्यादी शिकवणींच्या बद्दल ऐकल्यावर त्याचा असा समज झाला कि,, भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यानंतर त्याने लिच्छवींच्या सभेमध्ये बुद्धांसोबत वादविवाद करण्याचे जाहीर केले यासाठी लिच्छवींच्या राजकन्येला आपला वादविवादात असलेला दबदबा आपली विद्वानता बघण्यासाठी आमंत्रीत केले.


त्यावेळी भगवान बुद्ध महावन नावाच्या जंगलात असताना सच्चक आपल्या पाचशे अनुयायी व लिच्छवींसह भगवान बुद्धांकडे गेला. भगवान बुद्धांना भेटल्यानंतर काहीशी विचारपुस केली. आणि विशिष्ट विषयावर प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. भगवान बुद्धांनी संमती दिल्यानंतर, त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला जाणुन घ्यायचे होते कि भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले. (जेव्हा त्याने स्थाविर अश्वजीत यांच्याकडुन याबाबत माहीती करुन घेतली होती. परंतु त्याला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची लोकांसमोर पुष्टी करायची होती.)


सच्चक म्हणाला,, सम्यक संबुद्धांनी आपल्या शिष्यांना काय शिकवले..?


त्यावर भगवान बुद्ध म्हणतात,, सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व वेदना अनित्य आहेत, रुप अनित्य आहेत, संज्ञा अनित्य आहेत, विज्ञान अनित्य आहेत.... हे सच्चका सर्व रुप अनात्म आहेत, वेदना अनात्म आहेत, विज्ञान अनात्म आहेत. संज्ञा अनात्म आहेत, संस्कार अनात्म आहेत., सर्व धर्म अनात्म आहेत.


यावर सच्चकाने प्रतिकार करताना म्हटले कि, ज्याप्रमाणे बी किंवा प्राणी पृथ्वीचा आधार घेवुन वृद्धी प्राप्त करुन घेतात.


ज्याप्रमाणे बळ लागणारी कामे पृथ्वीचा आश्रय घेवुन संपन्न केली जातात. त्याचप्रमाणे पुरुष सुद्धा रुप, वेदना, संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांचा आश्रय घेऊन पुण्याचे सृजन करुन घेतात. सच्चक पुढे म्हणाला, माझ्या विचारांमध्ये रुप, वेदना, संस्कार, विज्ञान आणि माझा आत्मा आहे.


तेव्हा भगवंत सच्चकाला म्हणाले कि, राजा अजातशत्रु, राजा प्रसेनजीत अथवा अन्य कोणताही राजा आपल्या राज्यातील नागरीकास जिवे मारु शकतो.? जाळु शकतो.? देशाच्या बाहेर हाकलुन लावु शकतो काय.? सच्चक म्हणाला, होय हे संभव आहे. तेव्हा भगवंतांनी त्याला विचारले कि रुप माझा आत्मा आहे, तर हा रुप तुझ्या अधिपत्याखाली आहे काय.? माझा रुप असा असेल, माझा रुप तसा असेल.. हे आपल्या अधिकारात आहे काय.?


यावर पहिल्यांदा सच्चकाने मौन पाळले, दुसऱ्यांदा विचारल्यावरही सच्चक मौन होता. तिसऱ्यांदा विचारल्यावर सच्चक म्हणाला,, नाही भगवान... आपले म्हणने सत्य आहे..


यानंतर त्यान विचारलेल्या अन्य प्रश्नांना भगवंतांनी दिलेल्या उत्तरांचा तो स्वीकार करत गेला.


वादविवादात आपणच महाज्ञानी, सर्वश्रेष्ठ आहोत, हा त्याचा आंधळेपणा आता त्याला दिसु लागला होता.


• वेदना, विज्ञान, संस्कार, संज्ञा हे आपल्या शक्यते पलीकडे आहे.

• रुप अनित्य आहे.

• जो अनित्य आहे, तो दुःख आहे.

• अनित्य, दुःख, परिवर्तनशील आहे, त्याच्याबद्दल विचार करणे योग्य नाही.

• जी स्थीती रुपाची आहे, तिच स्थीती वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या सर्वांची सुद्धा आहे.



त्यानंतर सच्चक म्हणाला, आपले श्रावक काशाप्रकारे संशयविरहीत, आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर होऊन आपल्या शासनात विहार करतात..?

भगवान म्हणाले., माझे श्रावक भुत, भविष्य आणि वर्तमानात शरीराच्या आत किंवा बाहेर, दुर किंवा बाहेर जे काही रुप, वेदना, संज्ञा, संस्कार किंवा विज्ञान आहेत, त्यांना हे माझे नाही, हे मी आहे, नाही हा माझा आत्मा आहे, हे सर्व प्रज्ञेने पाहतात.


यानंतर सच्चक म्हणाला,, भिक्षु कशाप्रकारे, सम्यक ज्ञानाची प्राप्ती करुन अरहंतत्व प्राप्त करुन घेतो..? भगवान बुद्धांनी या प्रश्नाचे उत्तर पहिल्याप्रमाणेच दिले, सम्यक संबुद्धाने प्रभावीत होवुन त्याने भगवान बुद्धांना भिक्षुसंघासहीत जेवणाला आमंत्रीत केले...




सच्चं विहाय मति सच्चक वादकेतुं, वादाभिरोपितमनं अतिअंधभूतं । पञ्ञा पदीपजलितो जितवा मुनिंदो, तं तेजसा भवतु ते जयमंगलाननि



ज्या मुनींद्राने, सत्य सोडलेल्या व असत्यवादाला पोषक, अभिमानी, वादविवाद परायण व अहंकाराने अंध झालेल्या सच्चक नामक परिव्राजकास प्रज्ञाप्रदीपाने जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


See Also :

१. बुद्ध धम्म व काही प्रश्नोत्तरे : भाग १ (बुद्ध धम्म म्हणजे काय....?)

२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ५ : जैन तिर्थक आणि अनैतिकतेचा आरोप)

जयमंगल अष्टगाथा मधील पाचवी गाथा आपल्याला चिंचा नावाच्या स्त्री बद्दल माहीती सांगते,, या कथेत चिंचा नावाची स्त्री जैन तीर्थकांच्या सांगण्यावरुन भगवान बुद्धांवर अनैतिकतेचा आरोप करत असते.....




सुर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांची दशा झाली होती . लोक त्यांना आदर किंवा उपाहार देइनात. त्यामुळे राजरस्त्यावर उभे राहुन ते बोलु लागले, 'जर गौतम बुद्ध श्रमण असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. ह्यास्तव आम्हास दान द्या.



लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रमण गौतमांच्या चरित्याबद्दल कंडी पसरवुन संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट त्यांनी रचला. 


त्यावेळी श्रावस्तीमध्ये.. चिंचा नावाची एक ब्राह्मणी योगीनी राहात असे. तिचा देह आणी रुप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शके.


जैन तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवुन त्याला बदनाम करणे सुलभ होईल. वाकीच्या तीर्थकानी ह्या सुचनेस सहमती दर्शवली.


एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणी अभिवादन करुन ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. ह्यामुळे चकित होवुन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? तीनदा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगीनी! तुला माहीत नाही काय की, आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झाला आहे. नाही मला माहीत नाही! पण याबाबत मी काय करु शकते? त्यावर तीर्थक म्हणाले, भगीनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तु स्वतः गौतमाबद्दल कांड्या उठव. जेणेकरुन त्याची लोकप्रियता नष्ट होईल. त्यावर चिंचा ने ठिक आहे असे म्हटले व नंतर ती निघुन गेली....

स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणी नैसर्गीक सौंदर्यविशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहुन प्रवचन ऐकुन परत येत त्यावेळी रक्त-वस्त्र परिधान करुन, सुगंधित द्रव्ये लावुन हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारले, तु कुठे निघालीस? त्यावर ती उत्तर देइ तुम्हाला काय करायचे!

जेतवनाजवळील तीर्थिकारामात रात्र घालवुन ती प्रातःकाळी शहराकडे परत येइ, त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तु रात्र कुठे व्यतीत केलीस? तर ती उत्तर देइ, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालविली! काही लोकांच्या मनात तिच्या ह्या उत्तरामुळे संदेह निर्माण होई. काही महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरगुटे गुंडाळुन त्याचा आकार वाढवुन तिने सांगायला सुरुवात केली की, श्रमण गौतमापासुन आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दांवर विश्वास ठेवला.


नवव्या महिन्यानंतर तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणी कीटकदंशानी हात सुकवुन घेवुन ज्या स्थानी भगवान बुद्ध, भिक्खु व गृहस्थांसमोर प्रवचन करत होते तिथे जाऊन ति म्हणाले, हे महान उपदेशक! आपण पुष्कळ लोकांना उपदेश करता, आपली वाणी मधुर आहे आणी आपले ओठ फार नाजुक आहेत. आपल्याशी संबंध ठेवुन मी गर्भवती झाले आहे आणी प्रसुती-समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसुतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडी-अडचणीसाठी औषध पाण्याचीही काहीच सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला हि व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कोशल देशाचा राजा, अनाथ पिण्डिक किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही.? कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्यामुळे होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतृवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन अर्धवट सोडुन अत्यंत संयमाने गंभीर स्वरात भगवान बुद्ध बोलले, हे भगीनी, तु जे काही आता सांगीतलेस त्याची सत्यासत्यता फक्त आपणा दोघासच माहीत असणे संभाव्य आहे.


चिंचा जोराजोरात खोकलत म्हणाली, होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणा उभयतासच माहीत असणे संभाव्य आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होवुन ती फळी सरकुन तिच्या पायाशी पडली. चिंचा यामुळे अस्वस्थ झाली. त्यानंतर लोकांनी तिला काठ्यांनी आणी दगडांनी मारुन तिला हाकलुन दिले.


त्यानंतर तिला जाब विचारला असता, तिने जैन तिर्थकांबद्दल झालेल्या चर्चेबाबत सर्वांना सांगीतले त्यामुळे,, जैन तीर्थक लोकांच्या नजरेत आणखी खाली उतरले.


अश्या ह्या तीर्थकांची परंपरा पुढे चालवणारे,, लोक आजही जगात आहेत, ते वेळोवेळी, भगवान बुद्धाला, त्यांच्या धम्माला, त्यांच्या अनुयायांना कसे खाली दाखवता येइल,, याचा शोध घेत असतात,




कत्वान कटठमुदरं इव गब्भिनीया, चिञ्चाय दुट्ठवंचन जनकायमज्झे । सन्तेन सोम विधिना जितवा मुनिन्दो, तं तेजसा भवतु ते जयमंगलानि ।।


ज्या मुनींद्राने, पोटावर काष्ठ बांधुन गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन करणाऱ्या (बुद्धाला कलंक लावण्यासाठी) चिंचा नामक स्त्रीला, आपल्या शांती आणि सौम्यता या गुणांनी जिंकले, त्या भगवान बुद्धाच्या प्रतापाने तुमचे कल्याण होवो.



सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



Read Also :

१. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग १ : मारकथा)


२. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग २ : आलवक नामक यक्षाची गोष्ट)


३. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ३ : नालागीरी हत्तीवर विजय)



४. जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ४ : अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोरावर विजय)



शनिवार, २१ सप्टेंबर, २०१३

भगवान बुद्धांना स्त्रीद्वेष्टा म्हणणाऱ्या लोकांचे कोडे...

भगवान बुद्ध स्त्री द्वेष्टे होते, त्यांच्यामुळे भारतीय स्त्रीची अशी दुर्दशा झाली, त्यांनी आपल्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले असे विविध आरोप त्यांच्यावर केले जातात.


भगवान बुद्धांच्या शिकवणीसंबंधी जे खोडसाळ आरोप करण्यात येतात ते खोडुन काढणे हे प्रत्येक बौद्ध धर्मियांचे कर्तव्य आहे.


एखाद्या वेळी असल्या आरोपांचे खंडन करण्याची गोष्ट असती तर काही हरकत नाही,, पण आपल्या ठायी असलेल्या अज्ञानाच्या वा अर्धवट ज्ञानाच्या बळावर कितीतरी धर्ममार्तंड आणी त्यांची थुंकी झेलणारे असल्या प्रकारचे आरोप करतात. भगवान बुद्धांच्या शिकवणुकीवर हल्ले करणे व आरोप लावणे हे त्यांच्या विरोधकांचे व टीकाकारांचे आवडते काम, अगदी बुद्धकाळापासुन त्यांचा वारसा चालवणारी त्यांची पिल्लावळ आजही आपल्या समाजात वावरत आहेत, पण लवकरच त्यांचेही ह्रदय परिवर्तन होवुन ते सुद्धा भगवान बुद्धांनी सांगीतलेल्या सन्मार्गावर चालायला लागतील अशी खात्री आहे.
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेख लिहिला होता त्यातील काही भाग :
भगवान बुद्धांच्या धम्मावर जे काही आरोप होतात ते टीकाकाराच्या ठायी असलेल्या अज्ञानामुळेच!

भगवान बुद्ध हे स्त्री द्वेष्टे होते हे सिद्ध करण्यासाठी प्रामुख्याने एक पुरावा (खोटा?) दिला जातो.

भगवान बुद्धांनी प्रथम स्त्रीयांना संघात प्रवेश नाकारला, पण त्यांचे शिष्य आनंदाच्या सांगण्यावरुन त्यांनी स्त्रीयांना संघात प्रवेश दिला खरा, पण आठ अटींवर, आणी त्या आठ अटींमुळे त्यांच्या संघात स्त्रीयांना दुय्यम स्थान प्राप्त झाले.

अशा सर्व धर्ममार्तंड टीकाकारांना हा लेख एक सडेतोड उत्तर आहे...

स्त्रियांनी संघात येऊ नये, असे बुद्धांचे प्रथम मत होते. ते मत बदलुन त्यांनी स्त्रियांना संघात येऊ दिले, पण त्यांनी स्त्रियांचा वेगळा संघ निर्माण केला, तो भिक्खुणी संघ, भिक्खु संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे. यासंबंधीचे नियम भगवान बुद्धांनी तयार केले. या सर्व घटनांकडे बोट दाखवुन टीकाकार म्हणतात की, भगवान बुद्धांचे स्त्रियांसंबंधीचे मत चांगले नव्हते. या घटनांचा थोडा जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे.


१. महाप्रजापती परिव्रजा घेण्यास बुद्धांकडे आली तेव्हा, त्यांनी विरोध का केला? स्त्रियां जात्याच चंचल वृत्तीच्या असतात. त्या आपल्या संघात आल्या तर आपल्या संघाचे समाजातील स्थान कमी दर्जाचे होईल. आपला संघ समाजाला आदरणीय वाटणार नाही, असे बुद्धांना वाटले काय? किंवा






२. स्त्रियां ह्या बौद्धिक आणि नैतिक दृष्टीने आपल्या धर्मातील आणि संघातील पवित्र तत्वे जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वर्तन करण्यास असमर्थ आहेत असे बुद्धांना का वाटले. म्हणुन त्यांनी महाप्रजापतीच्या तसेच 500 शाक्य स्त्रियांच्या परिव्रजेला विरोध केला काय?

वरील दोन प्रश्नांपैकी दुसरा प्रश्न एकदा आनंदाने भगवान बुद्धांना विचारला होता. भगवान बुद्धांच्या संघातील स्त्री प्रवेशाला विरोध पाहुन त्यावेळी आनंदाच्या सर्व शंकाचे निरसन भगवान बुद्धांनी केलेले होते. तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले होते की, स्त्रिया आपला धम्म आणि धम्मशिक्षा जाणुन घेण्यास व त्याप्रमाणे वागण्यास सर्वस्वी समर्थ आहेत. पण या कारणामुळे बुद्धाचा स्त्रियांना विरोध नव्हता.

स्त्री बुद्धिमता आणि नीतीमता या बाबतीत पुरुषांपेक्षा कमी दर्जाची आहे, असे बुद्ध समजत नव्हता. स्त्रिया चंचल वृत्तीच्या आहेत, असे बुद्ध समजत होता; आणि संघात स्त्रियांना प्रवेश करु दिला तर संघाची समाजातील पत नाहीशी होईल , अशी बुद्धाला भिती वाटत होती. अशाप्रकारचे मत ज्या टीकाकारांचे आहे ते कवडीमोल किंमतीचे आहेत; कारण बुद्धाचे स्त्रियांबद्दल जर तसे मत असते तर त्याने स्त्रियांना संघात कधीही घेतले नसते. भिक्खुणी संघ भिक्खु संघाच्या खालच्या दर्जाचा ठरविण्यात बुद्धाची स्त्रीविषयक दृष्टी कलुषित होती असे जे टीकाकार म्हणतात, त्यांना हे उत्तर :

स्त्री आणि पुरुष यांच्यातील नैसर्गिक शारीरिक श्रेष्ठपणा आणि कनिष्ठपणा या गोष्टी लक्षात घेऊनच बुद्धाने, ही दोन संघाची योजना केली नव्हती. ती योजना करण्यात त्याचा केवळ व्यवहारी दृष्टीकोन होता. स्त्रियांना संघात घेण्याचा जेव्हा प्रश्न निघाला तेव्हा, बुद्धांच्या पुढे दोन प्रश्न उत्पन्न झाले.

स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी संघ एक असावा कि दोन वेगवेगळे संघ असावेत? खुप विचार केल्यानंतर त्यांनी ठरवले की, दोन वेगवेगळे संघ असावेत. परिव्रजा घेतल्यानंतर ब्रह्मचर्यावस्थेत राहणे याबद्दल भिक्खु आणि भिक्खुणी शपथबद्ध झालेले होते. परंतु ते हेकत्र राहिले तर, ही शपथब्द्धता अभंग ठेवणे शक्य नव्हते, म्हणुन भगवान बुद्धांनी ठरवले कि भिक्खु आणि भिक्खुणी यांचे संघ वेगवेगळे ठेवणे योग्य आहे. हे सर्व त्यांनी व्यवहारी दृष्टी ठेऊनच ठरविले. स्त्रियांना कमी लेखण्याची त्यांची मुळीच दृष्टी नव्हती. भिक्खुणींसाठी स्वतंत्र संघ निर्माण करण्याच्या वेळी बुद्धाला प्रश्न पडला कि, हे दोन्ही संघ समसमान पातळीवर ठेऊन त्यांत स्त्री-पुरुषांना निःशंक आणि निर्मळ मनाने मिसळता यीएल, अशी योजना करायची की, दोन्ही संघ एकमेकांपासुन अगदी वेगळे ठेवावेत.

भिक्खुणी संघ भिक्खु संघापासुन वेगळा ठेवणे आहे. हा निर्णय बुद्धाने घेतला होताच. भिक्खु आणि भिक्खुणी याण्ना कडक ब्रह्मचर्येचे व्रत पाळावयाचे होते, म्हणुन हा निर्णय ते व्रत पाळण्यास सहाय्यक ठरत होता. स्त्री आणि पुरुष यांच्या आयुष्यात वैषयिक भावनेला फार महत्व आहे याची भगवंताला जाणीव होती. 'वासना स्त्रीला पुरुषाची दासी बनवते तर पुरुषाला स्त्रीचा गुलाम' अशा प्रकारचे उद्गार बुद्धांनी एकदा काढले होते. ही वासना अनियंत्रित स्वरुपात राहिली तर, ती ब्रह्मचर्येला बळी न पडतील अशी व्यवहारी योजना त्यांनी केली, ती स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करुनच.

स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी भगवंतांनी वेगवेगळे संघ काढल. याशिवाय त्यांना दुसरा निर्णय घेत आला असता काय?



ते आठ नियम...


ज्या स्त्रिया संघात आल्या त्या व्यवहारात न पडलेल्या अशा किशोरावस्थेतील होत्या. धम्माची तत्वे आणि आचरणाचे नियम याबद्दल त्यांना उपदेश देऊन तयार करावयाचे होते. हे काम कोणी करावे? संघातील भिक्खुंशिवाय हे काम करण्यास दुसरे कोण योग्य होते? भिक्खु धम्म आणि आचराणाचे नियम पाळण्यात तरबेज झाले होते. म्हणुन बुद्धांनी कोणती सावधानता स्वीकारली? भिक्खु भिक्खुणींना शिकविताना गुरु शिष्यांचे पवित्र संबंध राखले पाहिजे, असा बुद्धांनी नियम केला होता, भिक्खु हे शिक्षक व भिक्खुणी ह्या शिष्या असत. शिक्षक म्हणुन भिक्खुचा दर्जा भिक्खुणींपेक्षा जास्त म्हत्वाचा होता. शिष्या म्हणुन भिक्खुणींचा दर्जा भिक्खुंपेक्षा कमी होतात, आज्ञाधारकपणाचा होता, भिक्खुसंघ हा भिक्खुणी संघावर शिक्षकाप्रमाणे अधिकार गाजवत होता, शासकाप्रमाणे त्यांच्यावर सत्ता गाजवत नव्हता. त्यांना गुलामांची वागणुक देत नव्हता. येथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे हे आठ नियम भिक्खुणींच्या ३३१ नियमांपेक्षा वेगळे का ठेवले गेले? या नियमांचा अंतर्भाव त्यांच्या ३३१ विनयांमध्ये का होत नाही. हे ज्या आठ नियमांच्या भरवशावर तुम्ही भगवान बुद्धांना स्त्री द्वेष्टे ठरवत आहात, तुमच्यापैकी कितीजन जाणतात कि, हे नियम श्रामणेरांसाठीसुद्धा लागु होतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक नवा भिक्खु जो दीक्षा घेतो त्याच्यासाठी सुद्धा हे नियम असतात... प्रत्येक भिक्खुने त्याच्यापेक्षा महान भिक्खुला अथवा भिक्खुणीला वंदन केले पाहिजेत असा नियम आहे. स्थाविर, महास्थाविर, इत्यादींद्वारे बौद्ध भिक्खुंचा स्तर कळत असतो,,, स्थाविराने महास्थाविराशी संपर्क करताना हे नियम पाळावे लागतात... स्त्री महास्थाविर बनु शकत नाही अशातला भाग नाही. मग स्थाविर अथा त्याच्यापेक्षा लहान भिक्खुने महास्थाविर थेरीला वंदन केलेच पाहिजेत...... हे तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे?

भिक्खुणी संघ भिक्खु संघाच्या आज्ञेत राहिला पाहिजे, हा नियम चुकीचा ठरतो कायआजच्या आधुनिक युगातही एखादी विद्यार्थीनी आपल्या शिक्षकाचा आदर सत्कार करत असेल तर ती हीन ठरते काय?

भिक्खु आणि भिक्खुणी यांच्यामधील संबंध नियमबद्ध करण्यासाठी बुद्धाने जी योजना आखली ती, स्त्रियांना कमी दर्जा देणारी होती, असा निराळा अर्थ कोणी का लावावा? असा अर्थ लावणे हे तर्कशुद्ध नाही काय? केवळ मुर्खच असा अर्थ काढु शकतात.

भिक्खुंच्या अधिपत्याखाली भिक्खुणींना बुद्धाने ठेवले हा त्याने एक मोठा सामाजिक गुन्हा केला असे जे मानतात, त्यांना बुद्धांनी स्त्रीवर्गाला संन्यासदीक्षा घेण्याची मुभा दिली याबबत जाणीव झाली नसावी. त्या काळात ब्राह्मणी धर्म स्त्रीवर्गाला ज्ञानार्जन करण्यास मुभा देत नव्हता. स्त्रियांनी संन्यास घ्यावा हा एक प्रश्न त्या काळी उपस्थित झाला तेव्हा, ब्राह्मणी धर्माने स्त्रीवर्गावर एक दुसरा अन्याय केला. ब्राह्मण हे वेदांची पुजा करत असत. वेदांना संन्यास मान्य नाही, हे जाणकारांना माहीत असेल, पण त्याकाळेद उपनिषद नावाची धार्मिक ग्रंथ अस्तित्वात होती. पण उपनिषद हि पवित्र धार्मिक ग्रंथ होते असे वैदिकांनी पुष्कळ काळापर्यंत मान्य केले नव्हते. हि ऐतिहासिक घटना आहे. तर्क नव्हे. उपनिषदे संन्यासाला आदर्श समजत होती. आत्मा हा ब्रह्म होय. ही उपनिषदातील प्रमुख शिकवण होय. ती शिकवण आत्मसात करणे हे संन्यासवृत्तीचे ध्येय होते, पण ब्राह्मण लोक संन्यासी जीवनाचे कट्टर विरोधक होते. संन्यासी वृत्तीबद्दल जे कडाक्याचे वादविवाद झाले, त्यांत शेवटी ब्राह्मणांनी संन्यास वृत्तीला मान्यता दिली, ती मान्यता काही अटींवर दिली होती. त्यापैकी एक अट अशी होती की, स्त्रिया व शुद्र यांना संन्यास घेण्याचा अधिकार नसावा.

स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार नसावा अशी अट वैदिकांनी घातली. याचे कारण काय, हे समजावुन घेतले म्हणजे बुद्ध आणि ब्राह्मण यांची स्त्रियांसंबंधी जी मते होती, त्यांच्यातील दक्षिणोत्तर फरक लक्षात येईल. हे कारण मनुने सांगीतले ते असे-

स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही, म्हणुन त्यांचे संस्कार वैदिक मंत्रांशिवाय करावयाचे असतात. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नव्हते. कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नव्हता. वैदिक मंत्र उच्चारले तर पाप नष्ट होते. ज्याअर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चार शकत नव्हत्या म्हणुन त्या असतय, पापी स्थितीत राहणाऱ्याच होत...

भारताचा इतिहास आपल्याला हे सांगतो की, प्राचीन काळात ब्राह्मणी धर्माने बंधनांची जी गुलामगिरीची जालीम साखळी निर्माण केलेली होती ती बौद्ध धर्माने खिळखिळी केली आणि शेवटी ताडकन तोडली. हे कसे घडले? वैयक्तिक स्वांतंत्र्य, सामाजिक विषमतेच्या कर्दनकाळातुन पददलित मानवाची प्रबळ इच्छा, आध्यात्मिक ज्ञानार्जनासाठी वनात जाऊन राहण्याची इच्छा उत्पन्न होताच कोणालाही वनात जाण्याचे स्वांतत्र्य असणे याबाबत जे नैसर्गिक मानवी हक्क होते, त्यांना बौद्ध धर्माने पाठिंबा दिला. ते आपले हक्क समाजात प्रस्थापित करु शकले. बौद्ध धर्माचे हे महान ऐतिहासिक कार्य आपल्याला नाकारता येणार नाही.

भगवान बुद्धांनी भारतातील स्त्रियांना हे जे स्वांतत्र्य दिले त्याचे महत्व न मोजता येण्यासारखे आहे. भिक्खुणी संघाला भिक्खु संघाच्या सामित्वाखाली ठेवहे ज्यांना चुकीचे वाटते, त्यांनी भगवान बुद्धांनी स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य लक्षात घेतले, तर ते आपला आरोप चुकीचा आहे हे मान्य करतील. भगवान बुद्धांनी स्त्रियांना जे स्वातंत्र्य दिले ते तकलुपी नव्हते. स्त्रियांनी त्या स्वातंत्र्याचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यांनी त्यांचे पोवाडे गाईले.

ब्राह्मण कन्या मेत्तिका भिक्खुणी झाल्यानंतर तिने एकदा असे उद्गार काढले. 'मी या शिळेवर दररोज ध्यानस्त बसते,तेव्हा स्वातंत्र्याचे श्वासोच्छवास माझ्या आध्यात्मिक साधनेवरुन एकसारखे वाहत असता.

दुसरी ब्राह्मण कन्या मुक्ता, भिक्खुणी झाल्यावर तिने, एकदा असे उद्गार काढले, अहाहा! मी खरोखरच स्वंतत्र आहे. माझ्या स्वातंत्र्याला सीमा नाही.

स्त्रियांना भिक्खुणी होण्याचा हक्क देवुन भगवंतांनी त्यांना स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करुन दिला. एवढेच नव्हे तर लिंगभेदाबद्दल यत्किंचितही अढी न बाळगता त्यांनी स्त्रियांना थोर पदाला पोहोचण्याचा मार्ग मोकळा करुन दिला. एवढेच नव्हे तर, पुरुषांच्या दर्जाबरोबर स्त्रियांचा दर्जा समान होण्याचा मार्ग मोकळा झाला.

तांत्रिक दृष्टीने भिक्खुणी भिक्खुंच्या हाताखाली राहत होत्या हे खरे आणि तितकेच स्पष्ट आहे. भिक्खु संघात जो पुरुष ज्ञान आणि श्रेष्ठत्व यामुळे उच्च पदावर विराजमान झालेला होता, त्याच्या बरोबरेचा भिक्खुणी संघातील थेरो हक्काने मिळवु शकत होती.

कश्यप (महाकश्यप) हा आध्यात्मिक बाबतीत श्रेष्ठ होता. तो संघात प्रमुख होता. त्याचा दर्जा संघसंस्थापक भगवान बुद्ध यांच्या खालोखाल होता. अध्यात्मिक बाबतीत ह्या अशा महान कश्यपाबरोबरीभा समान दर्जा भद्दा या थेरीने मिळविलेला होता. (वाचा : धम्मसुत्त ३७)... याबाबतीत हे स्पष्ट केले पाहिजे, असा दंडक घातलेला नव्हता, विवाहित, अविवाहित, विध्वा आणि वेश्या अशा सर्व प्रकारच्या स्त्रियांना परिव्रजा घेण्यास भगवंतांनी संघाचा दरवाजा खुला ठेवला होता. यामुळे सर्व प्रकारच्या स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य, समता, आत्मविकास, इत्यादी ही मानवी जीवणाची सर्व अंगे प्राप्त करुन घेता येत होती.

हे सुध्दा वाचा :


१. बुद्ध पुजा : पाली (Buddha Vandana in Pali)

२. बौद्ध पुजा आणि त्याबद्दल निर्माण होणारे गैरसमज

३. Buddha Vandana : English

४. बुद्ध वंदना : मराठी