बोधीसत्व सुमेध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बोधीसत्व सुमेध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ जून, २०१४

बोधीसत्वाचा धर्म कोणता......?




बोधीसत्व हे सामान्य मानव नसतात. सामान्यांना विचलीत करणाऱ्या, दुःखी करणाऱ्या किंवा आनंदी करणाऱ्या अनेक सामान्य गोष्टी ह्या बोधीसत्वाला विचलीत करु शकत नाही. त्यांचा आनंद सामान्यांसारखा कारणावर आधारीत नसतो, कारण कारणावर अवलंबुन असणारा आनंद हा अर्थातच अशाश्वत असतो. ते त्यांच्या मनाच्या सामर्थ्यावर सुखाची प्राप्ती करतात. बोधीसत्व सामान्य मानवाच्या मनावर असणारी बंधने तोडून निर्वाणाकडे वाटचाल करतात.

सामान्य मानवासारखे त्यांचे विचार संकुचीत नसतात. सामान्य मानवांमध्ये असणारी 'सांप्रदाया' सारखी संकुचीत बंधने सुद्धा त्यांच्यावर नसतात त्यामुळे ते हिंदु, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन यांच्यापैकी ते कोणत्याही सांप्रदायाचे नसतात. याठिकाणी 'बौद्ध' हा शब्द अनेकांना खटकला असेल, पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी आपल्य शिकवणीला कधीच 'बौद्ध धर्म' किंवा अनुयायांना 'बौद्ध' असे म्हटले नाही. मग काय म्हटले....? भगवानांनी आपल्या शिकवणीला धर्म (धम्म) म्हटले आणि अनुयायांना धार्मिक (धम्मिक).. जो विश्वव्यापी आहे, तो 'सांप्रदाया' सारख्या संकुचीत संकल्पनेच्या कक्षेत बसत नाही.

याअर्थी जगात केवळ दोनच धर्म आहेत. कोणते दोन....? १. सद्धर्म आणि २..अधर्म.

आणि हे दोन धर्म सुद्धा कोणत्याही सांप्रदायाच्या कक्षेत येत नाही. हिंदु, बौद्ध, जैन, शीख, इस्लाम, ख्रिश्चन या सांप्रदायातील लोक सुद्धा काही अधर्मी तर काही सद्धर्मी असतात.

धर्म आणि सांप्रदायातील मुळ फरक म्हणजे सांप्रदाय हा जन्माधारीत व्यवस्थेवर चालतो तर धर्म हा कर्माधारीत असतो. एखादा व्यक्ती कोणत्या सांप्रदायात जन्मला हे त्याच्या जन्मावरुन ठरते. कोणी हिंदु दांपत्याच्या घरी शीख होतो, इत्यादी ही जन्माधारीत व्यवस्था आहे. तो कोणत्या सांप्रदायाचा आहे हे त्याच्या जन्मावरुन ठरते. परंतु धर्माच्या बाबतीत तसे नाही. ती कर्माधारीत संकल्पना कोणी सद्धार्मिक किंवा अधार्मिक आहे हे त्याच्या चांगल्या




परमपुज्य दलाई लामांच्या विरुद्ध केला जाणारा प्रचार...



या मुद्याची सुरुवात करण्या पुर्वी मी तुम्हाला काही सुचवु इच्छीतो - तुमचा जर कर्म सिद्धांतावर विश्वास असेल तर कृपया दलाई लामांची किंवा अन्य कोणत्याही विद्वानांची निंदा करु नका.

दलाई लामा हे ब्राह्मण आहेत. आता ब्राह्मण कोणाला म्हणावे, हे मला नव्याने सांगावे लागु नये. ब्राह्मण विद्वानाला म्हटले जाते, कृपया याला एखाद्या विशीष्ट समाजातील लोकांबद्दल वापरुन सांप्रदायीक रुप देऊ नका.. आणि ब्राह्मणांचा अपमान करणे, त्यांची निंदा हे फार मोठे पाप आहे. याबाबतीत एक गोष्ट सांगाविशी वाटते.


एक कोकालिक नावाचा भिक्खु होता त्याची भगवान गौतम बुद्धांवर नितांत श्रद्धा होती परंतु तेवढाच तो सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांची निंदा करीत असे. तेव्हा भगवानांनी त्याला जवळ बोलावुन समजावुन सांगीतले कि, सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांची निंदा करु नकोस, तो म्हणाला., भगवानांच्या प्रति माझ्या मनात खुप श्रद्धा आहे ; परंतु सारीपुत्र आणि महामोग्गलायन हे पापकर्माच्या आहारी गेले.

भगवानांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही समजावल्यावर कोकालिक भिक्खुने ते समजुन घेतले नाही, आणि तो निघुन गेल्यावर त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यु झाला.


तेव्हा भगवानांनी इतर भिक्खुंना सांगीतले कि सारीपुत्र आणि महामोग्गलायन यांच्याप्रती मनात वैरभाव ठेवल्यामुळे त्याचा जन्म पद्म नावाच्या नरकात झाला. त्यावेळी भगवान म्हणाले –


मानवाच्या जन्मासोबतच त्याच्या तोंडात एक कुऱ्हाड उत्पन्न होत असते. मुर्खपणाच्या, वाईटपणाच्या गोष्टी बोलत असता तो तिने स्वतःलाच तोडत असतो. जो निंदनीय आहे, त्याची प्रशंसा करीत असतो आणि जो प्रशंसेस पात्र आहे त्याची निंदा करीत असतो. तो तोंडाने पापकर्म करीत असतो, त्या पापामुळे त्याला कधीही सुख मिळत नसते.
ते दुर्भाग्य तर फार लहान आहे, जो जुगारात आपले सर्व धन गमावतो., सर्वात मोठे दुर्भाग्य तर हे आहे, की जो बुद्धाच्या प्रति काही अपराध करतो. काया, वाचा आणि मनाला पापात लावुन शेकडो, हजार, निर्बुद्ध, आर्य पुरुषांची निंदा करणारा, नरकात कुजत असतो..


- (संयुक्त निकाय ६:१:१०)

या कथेचा संदर्भ घेऊन यानंतर आपण आर्य पुरुषांची निंदा करणार नाही अशी आशा आहे.


दलाई लामा मे, २०१४ च्या अखेरीस सोमैय्या महाविद्यालय परीसर, विद्याविहार, मुंबई येथे गेले असताना त्यांनी हिंदु देवांना नमस्कार केला याचा संदर्भ घेऊन अनेक बऱ्या - वाईट प्रतिक्रीया आल्या.




महाराष्ट्रातील काही कट्टर सांप्रदायीक लोक जे दलाई लामांची जे निंदा करतात, त्यांना टिका करण्याची संधीच मिळाली असेल. तर काही मित्र म्हणाले - कि दलाई लामा हे भारताच्या आश्रयाला आहेत, त्यांना तिबेट मुक्त करायचा आहे म्हणुन इथल्या लोकांना विश्वासात घेण्यासाठी ते असे करीत आहेत. त्यांना मी असे सांगु इच्छितो की, दलाई लामांचे विचार सामान्यांसारखे संकुचीत नाही. ते बोधीसत्व आहेत, निर्वाणगामी आहेत, निर्वाणाकडे वाटचाल करीत, स्वार्था सारख्या विचारांचा त्यांनी केव्हाच पराभव केला आहे.

दलाई लामांनी जे काही केले हा त्यांचा धर्माचाच भाग आहे. कोणता आहे त्यांचा धर्म.....?


असीम करुणा, मंगल मैत्री आणि शांतीचा प्रसार हा त्यांचा धर्म आहे.

बोधीसत्वाचा मुख्य धर्म हा दहा भांगामध्ये विभागला आहे. कोणते दहा ... ?

• दान

• शील

• नैष्कर्म

• विर्य

• क्षांती

• सत्य

• अधिष्ठान

• मैत्री

• उपेक्षा...

या सर्वांचे पालन करणे हाच त्यांचा खरा धर्म आहे ...

भगवान गौतम बुद्ध जेव्हा बोधीसत्वच होते, त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती. त्यावेळी त्यांनी सुद्धा याच धर्माचे पालन केले होते. या बद्दल चरिया पिटकात बोधीसत्वाच्या कथा सांगीतल्या आहेत...


सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


You might like to read :

चरिया पिटक मराठी..... [Download Ebook]

मंगल मैत्री आणि करूणेचा शास्ता

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध..

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा ... .


सोमवार, १४ एप्रिल, २०१४

चरिया पिटक मराठी.....







चरिया पिटक हे नाव तसे सामान्य वाचकांसाठी अपरीचीतच, परंतु पिटक हे नाव वाचताच धर्माच्या संबंधी आहे याची जाणीव होते. या पुस्तकाच्या नावाचा अर्थ होतो अर्थ होतो बोधीसत्वाच्या जीवनचर्या. भगवान गौतम बुद्धांनी त्यावेळी बुद्धत्वाची प्राप्ती केली नव्हती ते बोधीसत्वच होते. तो बराच मोठा कालावधी आहे, परंतु भगवान सारीपुत्राला आपल्या पुर्वजन्माच्या चर्यांबद्दल या पुस्तका मध्ये सांगतात कि त्यांनी कशा प्रकारे दहा पारमिता पूर्ण केल्या.

चरिया पिटकाचे तिपिटकातील स्थान शोधा...


हे पुस्तक वाचकांच्या स्वाधीन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आजच्या काळात धम्म साहित्य लिहिने, छापणे, विकणे याला लोकांनी आपला धंदाच बनविला आहे. मराठी इंटरनेट विश्वात धम्म साहित्याची कमतरता लक्षात घेता आमच्या संघाने मोफत धम्म सहित्य उपलब्ध करुन देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याच कार्यक्रमाचे एक पाउल म्हणजे चरिया पिटक मराठी नावाचे पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत. हे पुस्तक प्रकाशीत करताना बऱ्याच लोकांचे कळत - नकळत सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार....

साधू साधू साधू .....

सर्व जीव सुखी होवोत
सर्वांना हिताचा मार्ग सापडो..





सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

कालाम सुत्ताचे चुकीचे भाषांतर










Believe nothing, no matter where you read it, or who said it, no matter if I have said it, unless it agrees with your own reason and your own common sense.



आजकाल इंटरनेटच्या माध्यमातुन या इंग्रजी सुभाषीताचा बुद्धवचन म्हणुन प्रचार होताना दिसत आहे. परंतु हे खरे बुद्धवचन नाही आहे. तर मुळ पाली गाथेचे चुकीचे भाषांतर करण्यात आले आहे.


या इंग्रजी सुभाषीताचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो. कोणी सांगीतले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका, पवित्र धर्मग्रंथात लिहिले आहे म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका., मी स्वतः सांगीतले म्हणुन त्यावर विश्वास ठेवु नका. तुमच्या बुद्धीलापटत असेल तरच त्यावर विश्वास ठेवा. (जो खऱ्या वचनापेक्षा अगदी वेगळा आणि चुकीचा आहे)


या सुभाषिताचे मुळ आपल्याला अंगुत्तर निकायाच्या तिक्कनिपातातील 65 व्या कालाम सुत्ता मध्ये सापडते. जर आपण कालाम सुत्त बरोबर वाचले तर आपल्याला खरा समजुन येईल.


भगवान बुद्धांची कल्याणकारी शिकवण देशाच्या शहरा-शहरात, गावा-गावात एखाद्या झंजावाताप्रमणे पसरु लागली होती. त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी देशोदेशीचे श्रमण आणि ब्राह्मण त्यांच्याजवळ येत होते. असेच एकदा भगवान बुद्ध केसमुत्ती नावाच्या गावाला गेले असता, त्या गावातील कालामांनी भगवान बुद्धांना योग्य तो उपदेश करावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान म्हणाले...



‘एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ।





१. हि गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
२. हि गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
३. हि गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
४. हि गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
५. हि गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
६. हि गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका....


तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.



हा या गाथांचा खरा अनुवाद आहे. यामधील चौथा मुद्दा आहे कि कोणती गोष्ट तर्कसंगत आहे, आमच्या बुद्धीला पटते म्हणुन ती गोष्ट स्वीकारु नका, त्या गोष्टीवर विश्वास ठेवु नका. तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत कोणत्या गोष्टी वाईट, ज्या मार्गावर चालल्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल त्यानुसार आचरण करा आणि त्याचाच स्वीकारा... असे भगवान बुद्ध आपल्याला उपदेश करतात.



जर तर्कच सर्वश्रेष्ठ असता तर भगवानांना उपदेश करण्याची आवश्यकता काय असती...?


कारण प्रत्येक गोष्ट तर्कावर सुटु शकत नाही. आणि सत्यही तर्काच्या बळावर गवसणार नाही. या जगात वेगवेगळ्या स्वभावाचे वेगवेगळ्या बुद्धीचे लोक राहत असतात जर प्रत्येक जण आपआपल्या तर्कावरच विश्वास ठेवायला गेला तर जगातुन सत्य नाहीसे होईल. अंधविश्वासही वाढेल..


चांगल्या मानवकांचे तर्क चांगले तर वाईट माणवकांचे तर्क वाईटच असतील. परंतु सत्यापेक्षा ते वेगळेच असेल. ज्याचे त्याचे तर्क ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसारच असतील शिवाय आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवे कि सामान्य मानवाचे इंद्रिय हे मर्यादीत असतात. प्रत्येक गोष्ट ते त्याच्या तर्कावर सोडवु शकणार नाहीत.


उदा. मानवाचे कान अल्ट्रासोनीक साऊंड ऐकु शकत नाहीत., तसेच कित्येक सुक्ष्म जीव आपल्या डोळ्याने तो पाहु शकत नाही, हे सर्व मानवाच्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत..


या सर्वांपेक्षाही बुद्धाचा धर्म सहावा इंद्रिय मानतो, ते म्हणजे आपले मन.... सामान्य मानवाच्या मनाचीही शक्ती इतर इंद्रियांप्रमाणे मर्यादीत आहे...त्यामुळे केवळ तर्कावर तो सत्याचा शोध लावु शकणार नाही.


परंतु त्यासाठी (मनाची शक्ती वाढविण्यासाठी) एक मार्ग सांगीतला आहे. त्याने असा कुठेही दावा केला नाही कि त्याचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे. परंतु त्याचा हा धम्ममार्ग एकमेव मध्यम मार्ग आहे एवढे मात्र नक्की.

बुद्ध हे मानवाचेच विकसीत रुप आहे., मानवाच्या मनाच्या विकासाची शेवटची पायरी म्हणजे बुद्धत्व होय.

भगवान गौतम बुद्धांनी जे काही सांगीतले ते सर्वकाही स्वतःच्या अनुभवातुन, (तर्कावरुन नव्हे.!) आणि त्यांचा असा दावा आहे कि कोणीही हा सिद्धांत स्वतः अनुभवुन पाहु शकतो....

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...


आमच्या ब्लॉगचे सदस्य व्हा.

आम्हाला फेसबुकवर Follow करा

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

बोधीसत्व सुमेध आणि भगवान दीपंकर बुद्ध...


शेकडो वर्षांपुर्वी या लोकात भविष्य काळातील बुद्ध अमरावती नावाच्या संपन्न शहरात जन्मला सुमेध असे त्याचे नाव होते. सुमेध हा अमरावती शहरातील एका श्रीमंत दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे पालक हे पिढीजात श्रीमंत आणि सदाचारात शुद्ध होते.


सुमेध हा शिक्षण घेत असतानाच त्याच्या पालकाचे निधन झाले, त्यावेळेस तो सोळा वर्षांचा. वयात येईपर्यंत त्याच्या खजीनदाराने त्याच्या संपत्तीचे रक्षण केले.


जेव्हा त्याने पहिल्यांदा आपली संपत्ती बघितली तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, माझे पिता, माझे आजोबा, माझे पंजोबा आणि त्यांच्यापुर्वीच्या अनेक पिढ्या केवळ या संपत्तीची कमाई करु शकले, तिचे संवर्धन करु शकले परंतु मेल्यानंतर ते त्या संपत्तीला आपल्या सोबत घेऊन जाऊ शकले नाही. हि सर्व संपत्ती मी आपल्या सोबत घेऊन जाऊ शकणार काय..?


त्याचक्षणी त्याने यावर अतिशय खोल विचार केला. आणि त्याच्यात नवे चैतन्य संचारले. त्याने विचार केला कि जिथे उष्णता आहे तिथे शितलता नक्कीच आहे. त्याचप्रमाणे जिथे मरण आहे तिथे अमरता असायला हवी.


त्यानंतर त्याने आपल्या खजीन्याचे घर उघडले आणि आपली सर्व संपत्ती दान केली. आणि तो परिव्राजक बनला. केवळ सात दिवसांमध्येच त्याला श्रेष्ठ मानसीक शक्ती प्राप्त झाली....




भगवान दीपंकर बुद्धांचे आगमन



भगवान दीपंकर बुद्धांच्या आगमनाचा तो सोनेरी क्षण होता. शहरातील लोक बुद्धांच्या आगमनाची तयारी करत होते. रस्त्यांची सजावट दुरुस्ती चालली होती, सर्वजन भगवान दीपंकर बुद्धांची आतुरतेने वाट पाहत होते. श्रमण सुमेधाने बघितले कि नागरीक शहराच्या सजावटीमध्ये व्यस्त आहेत. हे सर्व पाहुन त्याला अश्चर्य वाटले. तो त्यांच्या जवळ आला आणि सुरु असलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगीतले कि आम्ही हे ऐकुन श्रमण सुमेधाला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला, बुद्ध हा शब्द ऐकणे खुप कठीण आणि दुर्मीळ आहे आणि बुद्धत्वाची प्राप्ती करणे अतिशय कठीण. श्रमण सुमेधाने विनंती केली कि मला सुद्धा तुमच्या या पवित्र कार्यामध्ये सहभागी होऊ द्या.


रस्ते दुरुस्तीचे आणि शहर सजावटीचे कार्य त्याला त्याच्या असामान्य कार्यक्षमतेने करावे लागणार होते. परंतु ते काम पुर्ण होण्यापुर्वीच भगवान दीपंकर बुद्धांचे त्यांच्या श्रावक संघासोबत शहरात आगमन झाले. भगवान बुद्धांच्या पवित्र पायांना धुळीने स्पर्श होऊ नये यासाठी श्रमण सुमेध एखाद्या पुलाप्रमाणे आडवा झाला.


भगवान बुद्धांची ती आर्य किर्ती पाहुन सुमेधला वाटले कि, माझी तर इच्छा आहे कि मी आजच अर्हंतपदाची प्राप्ती करावी. परंतु माझ्यासाठी चुकिच्या मार्गावर असलेल्यांना योग्य मार्गावर आणने हे सध्या योग्य नाही जेव्हा सर्व प्राण्यांचे जीवांचे संरक्षण करण्याची शक्ती माझ्याकडे आहे. मी भगवान दीपंकर बुद्धांप्रमाणे बुद्ध बनण्याचा प्रयत्न करेन..


त्यानंतर सुमेध म्हणाला,



• बुद्धो बोदेय्यम : मी चार आर्यसत्य जाणु शकेन जेणे करुन मी इतरांना त्यांच्याबद्दल सांगु शकेन.




• मुत्तो मोचेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाच्या बंधनातुन मुक्त झालो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्या सर्व बंधनातुन मी सर्वांना मुक्त करेन.




•तिन्नो तरेय्यम : ज्याप्रमाणे मी जीवनाचा अर्णव तरलो त्याचप्रमाणे इतरांनाही त्याबद्दल मार्गदर्शन करेन..



त्या तेजस्वी सुमेधाला पाहुन भगवान दीपंकर बुद्ध म्हणाला, हा तरूण श्रमण आपल्या जीवाची पर्वा न करता पुलासारखा जमीनीवर लेटुन आहे, यात काही संशय नाही कि भविष्यामध्ये हा माझ्यासारखा सम्यक संबुद्ध बनेल.




भगवान बुद्धांच्या वाणीतुन हि गोष्ट कळताच नागरीकांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी सुमेधाचा आदर सत्कार केला.


भगवान बुद्ध त्याच्या अंगावर पाय ठेऊन समोर गेले नाही, भगवान बुद्धांप्रमाणेच त्याचा बाजुने समोर गेले. भगवान दीपंकर बुद्धांच्या या वक्तव्याचा श्रमण सुमेधाने अतिशय आदरपुर्वक स्वीकार केला. त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला होता...


भगवान बुद्धांनी देव व मनुष्यांची एक परिषद बोलाविली ज्यामध्ये त्यांनी सांगीतले कि सुमेध हा बुद्धत्वाची प्राप्ती करणार. भगवान बुद्धांनी, अर्हंतांनी, देवांनी व मनुष्यांनी त्या सभेमध्ये सुमेधाला पुष्पगुच्छ भेट दिले आणि भगवान बुद्धांना त्याने नमस्कार केला आणि भगवान बुद्धांनी सुमेधाला दहा पारमितांची देशना केली.


त्या पुढीलप्रमाणे :



• दान
• शील
• नैष्कर्म
• विर्य
• क्षांती
• सत्य
• अधिष्ठान
• मैत्री
• उपेक्षा...


हे ऐकताच उपस्थीत सर्व जन उद्गारले साधू..! साधू..! साधू..!


बोधीसत्व बनल्यावर मनुष्य खालील व्याधींपासुन मुक्त होतो.


• आंधळेपणा
• बहिरेपणा
• वेडेपणा 
• मुकेपणा 
• लंगडे पणा
• तो रानटी राष्ट्रामध्ये जन्म घेत नाही.
• तो गुलामाच्या गर्भात जन्म घेत नाही.
• तो चुकिच्या श्रद्धांपासुन (अंधश्रद्धा) मुक्त होतो.
• तो पाच गुन्ह्यांपासुन मुक्त होतो. तो आपल्या माता पित्याचा आणि अर्हंताची हत्या करु शकत नाही. आणि बुद्धालाही कोणती हानी पोहोचवु शकत नाही. 
• तो कुष्ठरोगापासुन मुक्त होतो.. इत्यादी..


निरनिराळ्या बोधीसत्वांच्या काळात बोधीसत्वाने अनेक जन्म घेतले ते पुढीलप्रमाणे :

१. दीपंकर बुद्धां : सुमेध
२. कौण्डिण्य बुद्ध : विजितवी
३. मंगल बुद्ध : सुरुची
४. सुमन बुद्ध : अतुल
५. रेवत बुद्ध : अतिदेव
६. शोभीत बुद्ध : सुजाता
७. अनोमदस्सी बुद्ध : यक्ष
८. पदुम बुद्ध : सिंह
९. नारद बुद्ध : परिव्राजक
१०. पदुमुत्तरा बुद्ध : जटील
११. सुमेध बुद्ध : उत्तरा
१२. सुजाता बुद्ध : सम्राट
१३. पियदस्सी बुद्ध : कश्यप
१४. अत्तदस्से बुद्ध : सुशिम (परिव्राजक)
१५. धम्मदस्सी बुद्ध : शक्र (देवांचा राजा)
१६. सिद्धार्थ बुद्ध : मंगल (परिव्राजक)
१७. तिस्स बुद्ध : सुजीत (राजा)
१८. फुस्स बुद्ध : विजितवी (राजा)
१९. विपस्सी बुद्ध : ड्रॅगन
२०. सिखी बुद्ध : अरिंदम
२१. वेस्सभु बुद्ध : सुदर्शन (राजा)
२२. कुकुसंध बुद्ध : खेमा
२३. कोनागमन बुद्ध : पब्बत (राजा)
२४. काश्यप बुद्ध : ज्योतीपाल

खुप काळानंतर बोधीसत्वाने दहा पारमिता आचरणात आणल्या, आणि त्याने त्याचा शेवटचा जन्म शाक्य कुळातील राजा शुद्धोधनाची पत्नी महामाया हिच्या गर्भात घेतला, वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला आणि सहा वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर बुद्धत्त्वाची प्राप्ती करुन घेतली...

सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी फोटोवर क्लिक करा...



See Also :


भगवान बुद्धांचा धम्म निराळा आहे... (धम्मगुण - नक्की वाचा)

नव-बौद्धांवर वाढत चाललेला अजीत केसकंबलाच्या पंथाचा प्रभाव : धोक्याची घंटा....

गृहस्थांची कर्तव्ये... (पुजेचा खरा अर्थ : नक्की वाचा)

जयमंगल अष्टगाथा आणि त्यांच्या कथा (भाग ६ : सच्चक नावाच्या निर्गंथ पुत्रावर विजय)