tag:blogger.com,1999:blog-6316756106928411030.post8246599893033661531..comments2023-11-27T05:00:42.311-08:00Comments on The Buddhist way of life (बौद्ध जीवन मार्ग): केवळ "पुनर्जन्म" ह्या मान्यतेमुळे धम्म विज्ञाननिष्ठ नाही..?Piyush Khobragadehttp://www.blogger.com/profile/09968461565911866952noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6316756106928411030.post-40745180231968445392017-12-26T06:22:35.276-08:002017-12-26T06:22:35.276-08:00महत्त्वपूर्ण माहीती अगदी सोप्या व स्पष्ट शब्दात! ध...महत्त्वपूर्ण माहीती अगदी सोप्या व स्पष्ट शब्दात! धन्यवाद Dev bhivsanehttps://www.blogger.com/profile/08349490038923098655noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6316756106928411030.post-88212182240107003762015-06-29T00:17:14.420-07:002015-06-29T00:17:14.420-07:00कर्म आणि विपाक यावर एखादि लेख प्रकाशित करावा हि वि...कर्म आणि विपाक यावर एखादि लेख प्रकाशित करावा हि विनंतीAtulhttps://www.blogger.com/profile/13706714001322677572noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6316756106928411030.post-44070071389575121122015-06-25T22:00:55.019-07:002015-06-25T22:00:55.019-07:00बौध्द धर्मामध्ये पुनर्जन्माची मान्यता हि केवळ अध्य...बौध्द धर्मामध्ये पुनर्जन्माची मान्यता हि केवळ अध्यात्मिक विकासावर आधारलेली आहे, हि चुकीची माहिती आहे. पुर्वी माझी मान्यता सुध्दा अशीच, होती जेव्हा धर्माचा खोलवर अभ्यास केला तेव्हा समजले. हा पुनर्जन्म अगदी मृत्युनंतरचाच आहे.<br /><br />१. निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीला आपल्या पुर्वजन्मांचे स्मरण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. आर्यश्रावका शिवाय दुसरा त्याचे स्मरण करु शकत नाही. (अर्थात ते मृत्युनंतरच्या जन्माविषयीच बोलत असावेत, एका अवस्थेतुन दुसऱ्या अवस्थेत जाणाऱ्या व्यक्तीला आपल्या पुर्व अवस्थेचे सहज स्मरण करता येते.)<br />२. भगवान बुध्दांनी आपल्या सर्वच पुर्वजन्मांचे स्मरण केले आहे, सर्वज्ञ असल्यामुळे ते दुसर्यांची गती सुध्दा जाणतात. (५४७ जातक कथा ह्या बोधीसत्त्वाच्या पुर्वजन्मी केलेल्या चरियांच्या कथा आहेत.)<br /><br />३. २२७. ‘‘एतदग्गं , भिक्खवे, मम सावकानं भिक्खून पुब्बेनिवासं अनुस्सरन्तानं यदिदं सोभितो। <br />अर्थ : माझ्या श्रावकांमध्ये पुर्वजन्मांची अनुस्मृती करणाऱ्यात शोभीत अग्र आहेत.<br />(संदर्भ : अंगुत्तर निकाय, एककनिपात - २२७)<br />२४४. ‘‘एतदग्गं , भिक्खवे, मम साविकानं भिक्खुनीन पुब्बेनिवासं अनुस्सरन्तीनं यदिदं भद्दा कापिलानी।<br />माझ्या श्राविकांमध्ये पुर्वजन्मांची अनुस्मृती करणाऱ्यात भद्दा कापिलानी अग्र आहे.<br />(संदर्भ : अंगुत्तर निकाय, एककनिपात - २४४)<br /><br /><br />मिलिंद पन्हो ह्या ग्रंथांमध्ये राजा मिलिंद अर्हंत नागसेनांना विचारतो, <br />“Will you, Nàgasena, be reborn?”<br /><br />यावर अर्हंत नागसेन असे म्हणतात, “What is the use of asking that question again? Have I not already told you that if I die with attachment in my mind I shall be reborn, if not I shall not.”<br /><br />अर्थात जर मरत असतांना माझ्या चित्तामध्ये तृष्णा अस्तित्वात असेल तर पुनर्जन्म होईल, अन्यथा होणार नाही. ह्यालाच जोडून भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत आहे.<br />ती साखळी याप्रमाणे :<br /><br />अविद्या (Ignorance)<br />संस्कार (fabrications)<br />विज्ञान (consciousness)<br />नामरुप (name-&-form)<br />षडायतन (six sense media)<br />स्पर्श (contact)<br />वेदना (feeling)<br />तृष्णा (craving)<br />उपादान (clinging/sustenance)<br />भव (becoming)<br />जन्म (birth)<br /><br />अविद्या असल्याने संस्कार होत असतात. संस्कार असल्याने विज्ञान (consciousness) होते. विज्ञान (consciousness) असल्याने नामरुप होत असतात. नामरुप असल्याने षडायतन होत असते. षडायतन असल्याने स्पर्श होत असतो. स्पर्श असल्याने वेदना होत असते. वेदना असल्याने तृष्णा होत असते. तृष्णा असल्याने उपादान होत असते. उपादान असल्याने भव होत असते. भव असल्याने जन्म होत असतो.<br /><br /><br />त्या अविद्येला संपूर्णपणे हटविल्याने आणि नष्ट केल्याने संस्कार होत नसतात. संस्काराचा निरोध केल्याने विज्ञान (consciousness) होत नसते. विज्ञानाचा (consciousness) निरोध केल्याने नामरुप होत नसते. नामरुपाचा निरोध केल्याने षडायतन होत नसते. षडायतनाचा निरोध केल्याने स्पर्श होत नाही. स्पर्शाचा निरोध केल्याने वेदना होत नाही. वेदनेचा निरोध केल्याने तृष्णा होत नाही. तृष्णेचा निरोध केल्याने उपादान होत नसते. उपादानाचा निरोध केल्याने भव होत नाही. भवाचा निरोध केल्याने जन्म होत नाही..<br /><br />अर्थात जिथे जन्म आहे, तिथे जन्माचा निरोध सुध्दा शक्य आहे...Piyush Khobragadehttps://www.blogger.com/profile/09968461565911866952noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6316756106928411030.post-77771632195264682662015-06-25T07:15:01.586-07:002015-06-25T07:15:01.586-07:00बुद्ध धम्म आध्यात्मिक पुनर्जन्म मानतो. भौतिक पुनर्...बुद्ध धम्म आध्यात्मिक पुनर्जन्म मानतो. भौतिक पुनर्जन्म मानत नाही. आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणजे मनुष्याच्या जिवंतपणीच त्याच्या मनाचे एका अकुशल अवस्थेतून दुसर्या कुशल अवस्थेत रुपांतर होणे होय. Avinash Wawrehttps://www.blogger.com/profile/08173924962630749858noreply@blogger.com